विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यात मृत्यूचा आकडा काहीसा वाढला असून आज १५८ रुग्ण दगावले. बुधवारी ११६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दिलासादायक म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी अकोला, नागपूर, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.Changing situation in maharashtra
पुणे मंडळात सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे ४७ मृत्यूची नोंद झाली. ठाणे ३८, नाशिक ३४, कोल्हापूर ३२, लातूर ७ मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्युदर २.११ टक्के इतका आहे; तर मृतांचा एकूण आकडा १,३५,४१३ वर पोहोचला आहे.
राज्यात आज दिवसभरात ५,१३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,०६,३४५ झाली आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन ५८,०६९ इतकी झाली. आज दिवसभरात ८,१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६२,०९,३६४ इतकी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App