UN रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासे! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Mohammad Yunus मागील वर्षी बांगलादेशातील विद्यार्थी चळवळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालात […]
नवी दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नवीन एफआयआर प्रकरणात त्यांनी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चा अहवाल गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आला, त्यानंतर विरोधी पक्षांनी निषेध केला आणि गोंधळ घातला. काँग्रेसने अहवालाला एकतर्फी म्हटले आणि सांगितले की आमच्या अहसमतीस अहवालात स्थान देण्यात आलेले नाही.
महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आग लागण्याची घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यातील नागवासुकी परिसराजवळ ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोन तंबू रिकामे करण्यात आले होते.
Waqf बोर्ड सुधारणा विधेयका संदर्भात विरोधकांच्या सर्व सूचना परिशिष्ट यामध्ये सरकारने सामील केल्या तरी देखील विरोधकांचा जळफाळाट झाला. लोकसभा राज्यसभेतील सभात्याग केला.
केंद्रीयमंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी एअरो इंडिया २०२५ च्या स्वदेशीकरण कार्यक्रम आणि समारोप समारंभाला संबोधित केले. ते म्हणाले, भारत बदलाच्या एका क्रांतिकारी टप्प्यातून जात आहे. देशातील लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र प्रणाली, नौदल जहाजे केवळ आपल्या सीमांचे रक्षण करत नाहीत तर संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.
९० तासांच्या कामाच्या आठवड्यावरील वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, आंध्र प्रदेश सरकार महिलांसाठी घरून काम करण्याचा नियम लागू करण्याची योजना आखत आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ११ फेब्रुवारी रोजी याची घोषणा केली. तथापि, ही योजना कशी राबवली जाईल याबद्दल नायडू यांनी कोणतीही योजना शेअर केलेली नाही.
चिरंजीवी यांनी राजकारणात परतण्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता ते कधीही राजकारणात येणार नाहीत. राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक डीप-फेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्याबाबत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी यांचा हा डीप-फेक व्हिडिओ प्यारा इस्लाम नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
बुधवारी, एअरो इंडियाच्या तिसऱ्या दिवशी, बंगळुरूमधील येलहंका एअरबेसवर आधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रसंगी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे निर्मित हलके लढाऊ विमान (LCA) केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते, जे ५०,००० फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. त्याच वेळी, HAL चे लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) देखील आकर्षणाचे केंद्र बनले.
दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी शीख दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. राऊस अव्हेन्यू कोर्ट १८ फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावणार आहे. या खटल्याचा निकाल ४१ वर्षांनंतर आला आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीदरम्यान सरस्वती विहारमध्ये दोन शिखांच्या हत्येचा हा खटला आहे.
निवडणुकीदरम्यान दिल्या जाणाऱ्या मोफत योजना चुकीच्या असल्याचे बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तुम्ही लोकांना मोफत रेशन देत असल्याने लोक काम करू इच्छित नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. काहीही न करता त्यांना पैसे देणे, चूक असल्याची टिप्पणी देखील न्यायालयाने केली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजना आणि आनंदाचा शिधा सारख्या योजना बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी, मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १५ फेब्रुवारी रोजी फ्रान्स-अमेरिका दौऱ्यावरून मोदी परतल्यानंतर रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्यास झालेल्या विलंबामुळे, ‘आप’ने भाजपमध्ये फूट पडल्याचा दावा केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी संसदेत नवीन आयकर विधेयक मांडतील. बुधवारी खासदारांना त्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या. यातून ६४ वर्षांपूर्वीच्या आयकर कायद्यातील दुरुस्तीचे दर्शन घडते. दुरुस्तीमुळे आयकर कायदा-१९६१ ला सुलभ करून तो सामान्यांना समजण्यायोग्य होईल आणि यासंबंधीचे कोर्टकज्जेही कमी होण्यास मदत होईल, असा दावा सरकारने केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी भाजपसोबतचे आपले संबंध जुने असल्याचे सांगितले आणि आम्ही एकत्र आहोत आणि भविष्यातही एकत्र काम करू असे सांगितले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता राजदवरही निशाणा साधला. ते म्हणाले की २००५ पूर्वीच्या सरकारने बिहारच्या विकासासाठी काहीही केले नाही.
श्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपालांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. बोस यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये सर्व नेत्यांना सांगण्यात आले आहे की तुम्ही राज्यपालांची बदनामी केली आहे. जर या संदर्भात तात्काळ माफी मागितली नाही तर त्यांच्यावर प्रत्येकी ११ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला जाईल.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे चिंता वाढली आहे. या विषाणूमुळे येथे झालेला हा पहिला मृत्यू आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, संक्रमित व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्तांच्या मते, मृत व्यक्तीचे वय ५३ वर्ष होते. ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते आणि त्यानंतर नायर रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या एमपी एमएलए कोर्टाने समन्स बजावले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीप्रकरणी लखनऊ न्यायालयाने समन्स जारी केले आहे. मध्य प्रदेशच्या आमदार न्यायालयाने राहुल गांधींना २४ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे. यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुकेश अहलावत आणि संजय सिंह यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे माजी अधिकारी माइक बेंझ यांच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेंझ यांनी असा दावा केला आहे की मीडिया प्रभावाचा वापर करून, सोशल मीडिया सेन्सॉरशिपला प्रोत्साहन देऊन आणि विरोधी चळवळींना आर्थिक मदत देऊन अमेरिकेने भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या राजकारणावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
१९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात दोन जणांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. आता सज्जन कुमारच्या शिक्षेवर १८ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशाप्रकारची माहिती देणारा फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. खरंतर, ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा देण्यात आला होता. पंतप्रधान मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असल्याने, पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांना फोनबाबत माहिती दिली आणि तपास सुरू केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पॅरिसमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भारतातील अमेरिकेच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानातील गुंतवणुकीवर चर्चा केली. पॅरिसनंतर, पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला रवाना होतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून दिल्ली मराठी साहित्य संमेलनाचा मोठा गाजावाजा झाला. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पुरस्कार सोहळ्यामुळे त्यात राजकीय वादाची भर पडली, पण एवढे सगळे घडत असताना प्रत्यक्षात दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात साहित्य विषयक कार्यक्रमांचा बोजवारा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण साहित्य संमेलन अवघ्या १० दिवसांवर आले असताना त्याची तपशीलवार कार्यक्रम पत्रिकाच संयोजकांनी अद्याप जाहीर केलेली नाही.
आपल्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्सेलिसला पोहोचले. तिथे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहस आठवले. यासंदर्भात मोदींनी ट्विट करून सावरकरांच्या धाडसाला नमन केले. पण काँग्रेसला मात्र नेहमीप्रमाणे मोदींनी सावरकरांना नमन करणे खटकले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App