लसीबाबत खोडसाळपणा करणाऱ्या ब्रिटनला भारताचे चोख प्रत्युत्तर, आता ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांचे दहा दिवस आयसोलेशन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिटनने खोडसाळपणा करत भारतातून येणाºया प्रवाशांना दहा दिवसांचे आयसोलेशन सक्तीचे केले आहे. त्याला आता भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना भारतात 10 दिवसांसाठी वेगळे म्हणजे आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना आरटीपीसीआर चाचणी देखील करावी लागेल.India responds to UK over vaccine , now ten days isolation of UK passengers

कोव्हिशिल्ड ही लस ब्रिटनच्याच ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित झाली आहे. ब्रिटनने या लसीला मान्यता दिली आहे. मात्र, भारतीयांसाठी काही अटी जोडल्या. त्यामध्ये लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी भारतातून येणाऱ्या नागरिकांना दहा दिवसांचे आयसोलेशन सक्तीचे केले आहे.



भारतानेही यावर नाराजी व्यक्त केली होती. नवीन नियमांनुसार, ज्या भारतीयांना कोविडशील्ड लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना यूकेमध्ये आल्यावर 10 दिवसांसाठी अलग ठेवणे आवश्यक आहे आणि त्यांना चाचण्या देखील करावी लागते.

भारतीय नागरिकांनी ब्रिटनच्या या निर्णयाला वांशिक म्हटले होते. याला उत्तर देताना ब्रिटनने म्हटले की ज्यांना कोव्हशील्ड मिळते त्यांच्याशी त्यांना कोणतीही समस्या नाही. ते भारताच्या लसी प्रमाणपत्रावर विश्वास ठेवू शकत नाहीत. 24 सप्टेंबर रोजी भारत सरकारने म्हटले होते की आम्ही ब्रिटनला त्याच पद्धतीने प्रतिसाद देऊ शकतो.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले होते की, दोन्ही देशांची सरकार आपापसात बोलत आहेत. त्यांनी भारतीय प्रवाशांवर निर्बंध भेदभावपूर्ण म्हटले होते.भारत सरकारने केलेल्या नवीन आदेशात डोस घेतलेल्या प्रवाशांनाही चाचणी करावी लागेल.

प्रवाशांना प्रवास सुरू करण्याच्या 72 तासांपूर्वी आणि आगमनानंतर 8 दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. हा आदेश 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

India responds to UK over vaccine , now ten days isolation of UK passengers

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात