पाच राज्यांतील पराभवानंतर गांधीनिष्ठ थरुरही म्हणतात, संघटनात्मक नेतृत्वात सुधारणेची गरज!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाच राज्यांतील कॉँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता गांधीनिष्ठ म्हणविले जाणारे खासदार शशी थरुर यांनीही आता संघटनात्मक नेृत्वात सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हणत पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे.After the defeat in five states, Shashi Tharoor also said that there was a need for improvement in organizational leadership

थरुर यांनी म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की आयडिया ऑफ इंडियासाठी काँग्रेसने उभा राहून देशासाठी कार्यक्रम द्यावा. तसेच आमच्या संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, की जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल बदल टाळू शकत नाही.



पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाने संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची मागणी पक्षाचे खासदार शशी थरुर यांनी केलीशशी थरुर यांना कॉँग्रेसच्या जी-२३ या ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

या निकालामुळे दु:खी असून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची झपाट्याने पिछेहाट होत आहे. जी-२३ नेत्यांची पुढील ४८ तासांमध्ये बैठक होईल, असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.

After the defeat in five states, Shashi Tharoor also said that there was a need for improvement in organizational leadership

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात