सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या विशेष निरीक्षकांची भेट घेतली
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीत पश्चिम बंगालला महत्त्वाचे स्थान आहे. लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत ज्या प्रत्येक राजकीय पक्षाला जिंकायच्या आहेत.
तथापि, पश्चिम बंगालमधून निवडणुकीदरम्यान किंवा नंतर हिंसाचाराच्या अनेक बातम्या येत आहेत. या संदर्भात आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगासह विविध अधिकाऱ्यांकडे मोठी मागणी केली आहे.
भाजप नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या विशेष निरीक्षकांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, मी या संदर्भात पश्चिम बंगालचे राज्यपाल तसेच केंद्रीय गृहसचिव आणि पश्चिम बंगाल सरकारचे मुख्य सचिव यांना पत्र पाठवणार आहे की, आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय सैन्याने तीन महिने बंगालमध्ये राहावे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केला जाहीरनामा
सुवेंदू अधिकारी म्हणाले की, राज्यात गेल्या निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार खूपच भीतीदायक होता. त्यामुळे जनता आणि मतदारांचे रक्षण करण्यासाठी आणि राज्यघटना आणि लोकशाहीच्या व्यापक हितासाठी केंद्रीय सैन्याने निवडणुकीनंतरही राज्यात तैनात राहावे.
विशेष पोलिस निरीक्षकांसोबतच्या त्यांच्या भेटीबद्दल, अधिकारी सांगितले की ही एक शिष्टाचाराची बैठक होती आणि आम्ही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, विशेषत: मतदानानंतरच्या हिंसाचाराशी संबंधित उच्च न्यायालयाने दिलेला आदेश, NHRC अहवाल आणि 2023 च्या पंचायत निवडणुकीचा अनुभव हे होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App