मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय! वाग्दत्त वधूला ‘अश्लील मेसेज’ पाठवणे गुन्हा नाही, आरोपीची निर्दोष सुटका


लग्नाआधी वाग्दत्त वधूला अश्‍लील मेसेज पाठवणे हा गुन्हा नाही आणि त्यामुळे कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान होत नाही. असे म्हणत मुंबईतील सत्र न्यायालयाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार प्रकरणातून एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. लग्नाआधी वाग्दत्त वधूला अश्लील मेसेज पाठवणे हा कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान नाही, असे म्हणत न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच असे संदेश एकमेकांच्या भावना समजून घेणारे असू शकतात, असेही सांगितले. Maharashtra dirty message to Fiance is not an insult to her modesty says Mumbai session court


वृत्तसंस्था

मुंबई : लग्नाआधी वाग्दत्त वधूला अश्‍लील मेसेज पाठवणे हा गुन्हा नाही आणि त्यामुळे कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान होत नाही. असे म्हणत मुंबईतील सत्र न्यायालयाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार प्रकरणातून एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. लग्नाआधी वाग्दत्त वधूला अश्लील मेसेज पाठवणे हा कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान नाही, असे म्हणत न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच असे संदेश एकमेकांच्या भावना समजून घेणारे असू शकतात, असेही सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय तरुणावर 11 वर्षांपूर्वी त्याच्या वाग्दत्त वधूने लग्नाच्या बहाण्याने बलात्काराचा आरोप केला होता. याच प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, जर एखाद्याला दुसऱ्याला आवडत नसेल, तर त्याचे दुःख समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे हा त्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्या पक्षाने अशी चूक टाळली पाहिजे. न्यायालयाने म्हटले की या संदेशांचा उद्देश वाग्दत्त वधूसमोर आपल्या इच्छा व्यक्त करणे, लैंगिक भावना जागृत करणे इत्यादी असू शकते, हे संदेश वाग्दत्त वधूला आनंदीदेखील करू शकतात. पण अशा एसएमएसमुळे लग्न होणार्‍या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे म्हणता येणार नाही.



लग्नाच्या आश्वासन न पाळणे म्हणजे फसवणूक किंवा बलात्कार नाही

वास्तविक, महिलेने २०१० मध्ये त्या पुरुषाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. 2007 मध्ये एका मॅट्रिमोनिअल साइटवर दोघांची भेट झाली होती. मात्र, तरुणाच्या आईचा या लग्नाला विरोध होता, त्यामुळे तरुणाने २०१० मध्ये तरुणीशी संबंध तोडले. त्यावर कोर्टाने म्हटले की, लग्नाचे आश्वासन मागे घेणे याला फसवणूक किंवा बलात्कार म्हणता येणार नाही.

न्यायालयाने पुढे सांगितले की, तरुण मंगळसूत्र घेऊन आर्य समाज मंदिरात गेला होता. मात्र, या नात्याला आईची मान्यता मिळत नसल्याचे पाहून त्याने मुलीसोबतचे सर्व संबंध संपवले. तरुणाने आपल्या आईच्या इच्छेचे पालन केले आणि समस्येचा सामना करण्याऐवजी ते टाळण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या खोट्या आश्वासनांची ही केस नाही. प्रयत्न योग्य पद्धतीने न केल्याचे हे प्रकरण आहे.

Maharashtra dirty message to Fiance is not an insult to her modesty says Mumbai session court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात