चिपळूणमधील पूरग्रस्तांना सरकारचा ठेंगा; ४० दिवस उलटूनही दिमडीचीही मदत नाही


वृत्तसंस्था

चिपळूण : ‘ केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे’, या उक्तीचा ठाकरे- पवार सरकारला विसर पडला आहे. चिपळूणमधील पुराला चाळीस दिवस उलटूनही दिमडीची सरकारने मदत केली नाही, अशी व्यथा व्यवसायिकांनी मांडली. Even after 40 days flood victims of Chiplun did not get help from government

मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्टी नदीला २२ जुलै रोजी पूर आला. अख्खं शहर पाण्याखाली गेले. १७ तास पाण्याखाली शहर राहिल्याने घरांचे नुकसान झाले. बाजारपेठेतील दुकाने पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली. अनेक मंत्री महोदयांनी चिपळूणचे दौरे केले. व्यापाऱ्यांना आश्वासनेही दिली.



मुख्यमंत्री आले, डझनभर मंत्री आले, गेले तरीही मदत मिळत नाही. नक्की मदत गेली कुठे? मदतीचा पैसा जातो कुठे? असा सवालही व्यावसायिक करत आहेत.
आज चाळीस दिवस झाले अजूनही दुकाने तशीच आहेत. माल कसा भरायचा? घर खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आहोत.विमा पॉलिसी कंपनीने तर आमची फरफट केली आहे, असे व्यावसायिक सांगत आहेत.

धीर धरायचा तरी किती ?

सर्व नेत्यांनी तुम्ही धीर धरा, तुम्हाला योग्य तो न्याय देऊ, मदत करु, परत तुम्हाला उभेही करु, असे म्हणत मदतही जाहीर केली. त्यातली सरकारी दमडी देखील खात्यात जमा झाली नाही, असे व्यावसायिकांनी सांगितलं. आता धीर धरायचा तरी किती ? असा सवाल त्यांनी केला आहे.

Even after 40 days flood victims of Chiplun did not get help from government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात