Lockdown In Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणात तिरंगा फडकवला. यानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात वीरांना सलाम, असेही ते म्हणाले. Lockdown in Maharashtra will impose if oxygen crisis comes said CM Uddhav Thackeray on Independence Day
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणात तिरंगा फडकवला. यानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात वीरांना सलाम, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, महापुरुषांनी आपल्याला स्पष्ट केले आहे की स्वराज्य म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय! आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर चर्चा केली. तसेच पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यात गांभीर्य स्पष्ट दिसत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचे संकट कायम आहे. आपण कोरोनाचा कहर पाहिला आहे. आम्ही आरोग्य सुविधा वाढवत आहोत. ऑक्सिजनची उपलब्धता लक्षात घेऊन आम्ही लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता देत आहोत. ज्या वेळी आम्हाला वाटेल की ऑक्सिजनची उपलब्धता कमी होत आहे. त्या वेळी आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल. आम्हाला राज्यात सक्तीचे लॉकडाउन लावावे लागेल.
यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जाहीर संवादात स्पष्टपणे सांगितले होते की, जर कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता 700 मेट्रिक टनापेक्षा जास्त वाढली, तर राज्य सरकार तत्काळ प्रभावाने कडक लॉकडाऊन लागू करेल.
https://t.co/WOWAy8nAdU — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2021
https://t.co/WOWAy8nAdU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2021
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणाचा वेग वाढला आहे. काल (14 ऑगस्ट) राज्यभरात साडे नऊ लाख लोकांना लसीकरण करण्यात आले. एका दिवसातील हा सर्वात मोठा विक्रम आहे. आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आपण आपले राज्य आणि देश कोरोनामुक्त करून जगू. कोरोनापासून मुक्ती मिळवू. कोरोनाला हद्दपार केल्याशिवाय आपण राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Lockdown in Maharashtra will impose if oxygen crisis comes said CM Uddhav Thackeray on Independence Day
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App