वार – पलटवार : राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपकडूनही टीकास्त्र, पात्रा म्हणाले, ‘गांधी कुटुंबाकडून लखीमपूर खीरी शोकांतिकेचा वापर बुडणारे जहाज वाचवण्यासाठी!’

BJP leader sambit patra targets rahul gandhi says Gandhi family using Lakhimpur Kheri tragedy as opportunity to save its sinking ship

Lakhimpur Kheri tragedy : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसक घटनेवरून राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला हुकूमशाही म्हटले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर हल्ला करताना त्याला संधीसाधू राजकारण म्हटले आहे. भाजपचे म्हणणे आहे की, अंतर्गत लढाईला बळी पडलेली काँग्रेस लखीमपूर खीरी हिंसाचाराकडे संधी म्हणून पाहत आहे. “काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या प्रश्नांना सामोरे जाणारे गांधी कुटुंब लखीमपूर खीरी दुर्घटनेचा वापर त्यांच्या बुडत्या जहाजाला वाचवण्याच्या संधी म्हणून करत आहे,” असे भाजपने म्हटले आहे. BJP leader sambit patra targets rahul gandhi says Gandhi family using Lakhimpur Kheri tragedy as opportunity to save its sinking ship


प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसक घटनेवरून राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला हुकूमशाही म्हटले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर हल्ला करताना त्याला संधीसाधू राजकारण म्हटले आहे. भाजपचे म्हणणे आहे की, अंतर्गत लढाईला बळी पडलेली काँग्रेस लखीमपूर खीरी हिंसाचाराकडे संधी म्हणून पाहत आहे. “काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या प्रश्नांना सामोरे जाणारे गांधी कुटुंब लखीमपूर खीरी दुर्घटनेचा वापर त्यांच्या बुडत्या जहाजाला वाचवण्याच्या संधी म्हणून करत आहे,” असे भाजपने म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सरकारवर घणाघाती हल्ला केल्याबद्दल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, बेजबाबदारपणा हे त्यांचे दुसरे नाव बनले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस लोकांना हिंसाचारासाठी भडकवण्यासाठी शक्य ते सर्व करत आहे. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या अनेक विरोधी नेत्यांना लखीमपूर खीरीला भेट न देण्याच्या निर्णयावर पात्रा म्हणाले की, शांतता राखणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे.

राहुल गांधींच्या हुकूमशाही विधानावर भाजपचे प्रत्युत्तर

“देशात लोकशाही नसून हुकूमशाही अस्तित्वात आहे, या राहुल गांधी यांच्या आरोपाचा पात्रा यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. म्हणाले की, लोकशाही आहे म्हणूनच तुम्ही पत्रकार परिषद घेण्यास सक्षम आहात. ते म्हणाले की, पत्रकार परिषदेसाठी तुम्हाला भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाचा कधीही सामना करावा लागला नाही, दुसरीकडे, काँग्रेस सदस्यांनी कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानावर टोमॅटो फेकले.”

काय म्हणाले होते राहुल गांधी?

वास्तविक, राहुल गांधी लखीमपूर खीरीच्या मुद्द्यावर भाजप नेतृत्वाखालील राज्य सरकारवर सतत हल्ला करत आहेत. बुधवारी ते म्हणाले की, कधीकाळी भारतात लोकशाही होती, पण आता हुकूमशाही आहे. उत्तर प्रदेशात गुन्हेगार मुक्तपणे फिरू शकतात, तर पीडितांना तुरुंगात टाकले जाते, असा आरोपही त्यांनी केला. यादरम्यान, त्यांनी लखीमपूर खीरीला जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्याबाबतही सांगितले आहे.

ते म्हणाले, ‘हुकूमशाही म्हणजे भयंकर चोरी होत आहे. शेतकऱ्यांकडून चोरले जात आहे, सामान्य लोकांच्या खिशातून चोरले जात आहे, सामान्य लोकांचा आवाज चिरडला जात आहे. प्रियांका गांधींना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल राहुल म्हणाले की, धक्काबुक्कीने काही फरक पडत नाही. आम्हाला मारा, काही फरक पडत नाही, कारण आम्हाला आमच्या कुटुंबात असे प्रशिक्षण मिळाले आहे. पण आम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलत राहू.”

काँग्रेस पक्षातील नेत्यांची मोठी फौज लखीमपूर खीरीच्या मुद्द्यावर सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहे. राहुल गांधींव्यतिरिक्त प्रियांका गांधी, भूपेश बघेल, अशोक गेहलोत, चरणजित सिंह चन्नी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा यात समावेश आहे. याशिवाय शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांसारखे इतर पक्षांचे नेतेही योगी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात मोर्चा उघडत आहेत.

भाजपचा विरोधकांवर अशांतता आणि अराजक पसरवल्याचा आरोप

भाजपचे नेतेही काँग्रेसच्या आरोपांना आणि त्यांच्या वक्तव्यांना कडाडून विरोध करत आहेत. संपूर्ण प्रकरण पाहता, भारतीय जनता पक्षाने राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेस, सपा, बसपासह इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधताना म्हटले की, विरोधी पक्षांचा उत्तर प्रदेशात अशांतता आणि अराजकता पसरवण्याचा हेतू आहे.

त्यांनी आरोप केला की, विरोधी पक्षांना शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही, त्यांना त्यांच्या व्होट बँक आणि त्यांच्या राजकीय हितसंबंधांची जास्त काळजी आहे. ते म्हणाले, ‘विरोधकांकडून करण्यात येत जात असलेल्या राजकीय नाटकाचे सत्य जनतेला माहीत आहे, पण त्यांच्या भूलथापांना कुणीही बळी पडणार नाही.’ ते म्हणाले, “ज्यांच्या नावे शेतकऱ्यांचा नरसंहार आहे, ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, ते आता शेतकऱ्यांच्या नावावर अराजकता आणि हिंसाचाराचे षडयंत्र रचत आहेत आणि शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती म्हणाल्या की, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आणि त्यांच्या पक्षातील इतरांना शेतकऱ्यांविषयी आणि लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उमा भारती यांनी ट्विट केले, ‘उत्तर प्रदेश प्रभारी आणि काँग्रेस सरचिटणीस वड्रा आणि इतर काँग्रेस नेते ज्या मुद्यांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा मुद्द्यांवर बोलू नये.’

त्या म्हणाल्या, “स्वातंत्र्यानंतर लगेचच गांधीजींनी देशातील मुख्य आर्थिक आधार म्हणून शेतीचा विचार करण्याचे स्वप्न तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी नष्ट केले. मग शेती आणि शेतकरी मागे राहिले. देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेस पक्षाने लोकशाहीचा तोंडाने उच्चार करण्याचा अधिकार गमावला आहे. 1984च्या दंगलीत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दहा हजार शिखांना जिवंत जाळले. अहिंसा हा शब्द काँग्रेसच्या तोंडाला शोभत नाही.”

लखीमपूर प्रकरणात गुन्हा दाखल

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा ‘टेनी’ यांा मुलगा आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनू विरुद्ध लखीमपूर खीरी येथे केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात एका शेतकऱ्यावर गोळीबार करून हत्या करणे आणि शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा आरोप आहे. खीरी जिल्ह्यातील टिकुनिया पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. बहराईच जिल्ह्यातील नानपारा भागातील बंजारन तांडा येथील रहिवासी जगजीत सिंह यांनी सोमवारी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिषसह 15-20 अज्ञात लोकांनी जीप चालवल्याचा आणि शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.

BJP leader sambit patra targets rahul gandhi says Gandhi family using Lakhimpur Kheri tragedy as opportunity to save its sinking ship

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात