विशेष प्रतिनिधी
मुबंई : मागे अमिताभ बच्चन यांच्यावर सोशल मिडीयावर प्रचंड टीका झाली होती. कारण त्यांनी पान मसाला ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले होते. इतक्या मोठ्या अभिनेत्यांनी अशा प्रकारच्या प्रॉडक्टची जाहिरात करू नये, असे लोकांचे मत होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी देखील आपले स्पष्टीकरण दिले होते.
Amitabh Bachchan decided to send a notice to Pan Masala Company
तरी देखील अमिताभ बच्चन यांनी कंपनीसोबतचा करार संपविण्याचा निर्णय घेतला होता. आता नुकताच इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बिग बींनी या कंपनीला नोटीस पाठवली आहे. कारण करार संपल्यानंतर देखील अमिताभ यांच्या जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जात आहेत. याबद्दल आक्षेप घेत अमिताभ बच्चन यांनी कंपनी नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
वाद वाढल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ब्रँडशी करार केला रद्द, मानधनही केले परत
अमिताभ बच्चन यांच्यासोबत रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुखने हे कलाकार देखील पानमसालाच्या जाहिरातींमध्ये काम करतात. पण फक्त अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी या कंपनीसोबतचा करार रद्द केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more