वृत्तसंस्था
नवी दिल्ली :Haryana हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. राज्यात असे करणारा हा एकमेव पक्ष असेल. राज्यातील एकूण 90 जागांपैकी पक्षाने 48 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. 2 जागांची अधिकृत घोषणा बाकी आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 8 जागांची वाढ झाली आहे.Haryana
दुसरीकडे, काँग्रेसने 37 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत 6 जागांचाही फायदा झाला आहे. मुख्यमंत्री नायब सैनी लाडवा आणि काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा गढी-सांपला मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
Nobel Prize : AI गॉडफादर जेफ्री ई. हिंटन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
काँग्रेसने हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. सीएम सैनी म्हणाले की, जनतेने काँग्रेसचा खोटारडेपणा नाकारला आहे. भाजपच्या आघाडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदन केले. दरम्यान, नवीन सरकारचा शपथविधी दसऱ्याला म्हणजेच 12 ऑक्टोबरला होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
#WATCH | Delhi: On the Congress party's performance in Haryana, party MP Jairam Ramesh says, "…Whatever analysis we have to do about Haryana, we will definitely do it. But first of all, we have to send the complaints that are coming from different districts to the Election… pic.twitter.com/kh1AsZ2YYX — ANI (@ANI) October 8, 2024
#WATCH | Delhi: On the Congress party's performance in Haryana, party MP Jairam Ramesh says, "…Whatever analysis we have to do about Haryana, we will definitely do it. But first of all, we have to send the complaints that are coming from different districts to the Election… pic.twitter.com/kh1AsZ2YYX
— ANI (@ANI) October 8, 2024
काँग्रेस नेते जयराम नरेश म्हणाले- हरियाणाचे निकाल धक्कादायक आहेत
हरियाणातील निकालादरम्यान काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. नेते जयराम रमेश म्हणाले, ‘हरियाणाचे निकाल धक्कादायक आहेत. आम्ही हे निकाल स्वीकारू शकत नाही. येथे लोकशाहीचा पराभव झाला असून भाजपच्या व्यवस्थेचा विजय झाला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. सर्व तक्रारी एकत्रित करून आयोगासमोर ठेवल्या जातील.
काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले, ‘हरियाणाचे निकाल पूर्णपणे अनपेक्षित आहेत. आम्ही असे म्हणू की हे अस्वीकार्य आहे. हिस्सार, महेंद्रगड आणि पानिपत या तीन जिल्ह्यांमधून आमच्या उमेदवाराबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. ज्या मशिनच्या बॅटरी 99% चार्ज झाल्या त्यात आमचा उमेदवार कसा हरताना दिसतोय आणि ज्या मशीनला हातही लावला जात नाही, ज्यांच्या बॅटरी 60-70% चार्ज झाल्या आहेत, त्यात आमचा उमेदवार विजयी होताना दिसतोय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App