वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 2020 च्या दिल्ली दंगलीप्रकरणी मंगळवारी दिल्ली न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवले. पोलिसांनी आरोपींवर लावलेले आरोप योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी हे बेकायदा जमावाचा भाग होते. ज्यांचा उद्देश हिंदू समाजाच्या संपत्तीचे नुकसान करणे हा होता. हे प्रकरण गोकुळपुरी भागात दंगल, जाळपोळ आणि तोडफोडीशी संबंधित आहे.9 people guilty in Delhi riots case Court said – Nuisance was committed to damage the property of a particular community
पोलीस सातत्याने आरोपींना मागे हटण्यास सांगत होते, असे न्यायालयाने नमूद केले. त्यानंतरही आरोपींनी दंगल सुरूच ठेवली. सध्या न्यायालयाने सर्व दोषींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 29 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
न्यायालयाने या आरोपींना ठरवले दोषी
अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचाला यांनी मोहम्मद शाहनवाज ऊर्फ सानू, मोहम्मद शोएब, शाहरुख, रशीद ऊर्फ राजा, आझाद, अश्रफ अली, परवेझ, मोहम्मद फैसल आणि रशीद यांना दंगल, चोरी, जाळपोळ याप्रकरणी दोषी ठरवले.
रेखा शर्मा यांनी दाखल केली होती याचिका
रेखा शर्मा नावाच्या महिलेने या दंगलींशी संबंधित याचिका न्यायालयात दाखल केली होती. रेखा यांनी आरोप केला होता की 24-25 फेब्रुवारी 2022 रोजी जमावाने त्यांच्या घरावर हल्ला केला होता. आरोपींनी त्यांचे घर लुटले आणि पहिल्या मजल्यावरील खोल्या पेटवून दिल्या. यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याचे दावे बरोबर मानले आणि 9 आरोपींना दोषी ठरवले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App