आसाममध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; 19 लाख लोकांना झळ; पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन


वृत्तसंस्था

गुवाहाटी : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आला असून त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणचे हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पुरामुळे तब्बल 19 लाख लोक बाधित झाले आहेत. या लोकांना होत असलेल्या अडचणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त करून आसामला मदतीचे आश्वासन देखील दिले आहे.Floods disrupt life in Assam; 19 lakh people affected; Prime Minister’s assurance of help



पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता 

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले आहे.

 54 लोकांचा मृत्यू

राज्यातील 35 जिल्ह्यातील 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या 28 जिल्ह्यांतील 2 हजार 930 गावांतील 19 लाख लोक बाधित झाले आहेत. मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळे आत्तापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने, घरे पाण्याखाली जात आहेत.

Floods disrupt life in Assam; 19 lakh people affected; Prime Minister’s assurance of help

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात