तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकण्याची गरज आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.Ramdas Athavale response to KCR statement to throw BJP in Bay of Bengal, said- We will drown them
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकण्याची गरज आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे भाजपला बंगालच्या उपसागरात फेकण्याचे वक्तव्य चांगले नसल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. आम्ही त्यांना कन्याकुमारीपासून 3 महासागरात बुडवू, असेही ते म्हणाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदूरदर्शी म्हणत राव म्हणाले की, भाजपला बंगालच्या उपसागरात फेकण्याची गरज आहे. देशासाठी जे आवश्यक असेल ते आम्ही करू. ही लोकशाही आहे. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत देताना ते म्हणाले, देशात नेतृत्व बदलाची गरज आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
या देशाला खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे यावर आम्ही काम सुरू करू, असे ते म्हणाले. माझा ठाम विश्वास आहे की आपला देश मजबूत आहे आणि आपला देश आवश्यक तिथे प्रतिसाद देतो. केसीआर पुढे म्हणाले की, बदलाची गरज आहे. देशात क्रांतीची गरज असून जोपर्यंत लढणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. सिंगापूर सरकारकडे काहीच नाही पण त्यांच्याकडे मेंदू आहे, आमच्या सरकारकडे सर्व काही आहे पण त्यांच्याकडे मेंदू नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App