वृत्तसंस्था
नाशिक : अनेक मंत्री फरार आहेत. काही तुरूंगात गेले. पोलिस अधिकार्यांना वसुलीचे टार्गेट दिल्याने राज्य वार्यावर आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही, सरकार कोण चालवतं हेही समजत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सुसाशन आणण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी केले. Minister absconding, Chief Minister at home, then state government Who drives; Question by Prakash Javadekar
माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जावडेकर म्हणाले की, दररोज पंधरा कोटी तर दर महिन्याला साडेचारशे कोटी व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी भाजपाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोविड काळात भाजपने मोफत लस, धान्य, गॅस सिलेंडर, ऑक्सिजन, अन्न यांचा घरोघरी पुरवठा केला. जिल्ह्यात ऑक्सीजन प्लांट उभारले.
ते म्हणाले, १४० कोटी लोकांना मोफत कोरोना लस दिली. जेनेरिक औषधांमुळे औषधे स्वस्त झाली. डिजिटल क्रांतीमुळे सेवा दारात आल्या. दुसरीकडे महाराष्ट्रात तर पोलिसच खून करतात. अंबानीच्या बंगल्याबाहेर बॉम्ब ठेवतात. या उलट त्यामुळे अटलजींना अभिप्रेत असलेले सुशासन केंद्रातले मोदी सरकार राबवत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App