खलिस्तान समर्थक अमृतपालचा दावा : मी भारतीय नागरिक नाही, पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज


वृत्तसंस्था

अमृतसर : पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यावर आपल्या समर्थकांसह हल्ला करणारा खलिस्तान समर्थक ‘वारीस पंजाब दे’ प्रमुख अमृतपाल याने स्वत:ला भारतीय नागरिक मानण्यास नकार दिला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमृतपाल म्हणाला की, मी स्वत:ला भारतीय नागरिक मानत नाही. पासपोर्ट हा केवळ प्रवासी दस्तऐवज आहे, त्याने कुणी भारतीय बनत नाही.Khalistan supporter Amritpal’s claim I am not an Indian citizen, passport is just a travel document

अमृतपालने आपला जवळचा मित्र लवप्रीत सिंग तुफानची सुटका करण्यासाठी त्याच्या समर्थकांसह अजनाला पोलिस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याच्यापुढे नतमस्तक होऊन तुफानची तुरुंगातून सुटका केली.



शांततापूर्ण आंदोलन रोखले तर पोलीस हिंसाचार रोखू शकणार नाहीत

अमृतपाल म्हणाला की, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन थांबवले तर हिंसाचार थांबवणे त्यांना शक्य होणार नाही. दहशतवाद ही अशी गोष्ट नाही जी मी सुरू करू शकेन. कोणीही दहशतवाद सुरू किंवा बंद करू शकत नाही. ते स्वाभाविक आहे. जेव्हा एखाद्याला मर्यादेपलीकडे दडपले जाते तेव्हा दहशत निर्माण होते.

अमित शहा यांनी आम्हाला धमकी दिली

अमृतपाल म्हणाला की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खलिस्तानी चळवळ दडपून टाकू असे वक्तव्य केले होते. याचे परिणाम भोगावे लागतील, असे मी उत्तर देताना म्हटले होते. याचा अर्थ अमित शहांचीही इंदिरा गांधींसारखी हत्या होईल असा नव्हता. अमित शहा यांना ही धमकी नव्हती, तर त्यांनी आम्हाला धमकी दिली होती.

खलिस्तानची अतिशय सामान्य चर्चा

अमृतपाल म्हणाला की, पंजाबमध्ये खलिस्तान ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. अमृतपाल म्हणाला की, जर कोणी पंजाबी नसेल आणि पंजाबमध्ये येत नसेल तर त्याला भीती वाटते. पण तसे नाही. हा गुन्हा नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. संगरूरचे खासदारही खलिस्तान जिंदाबाद म्हणतात.

खलिस्तानला विरुद्ध हिंदु राष्ट्र

अमृतपालने खलिस्तानचा संबंध हिंदू राष्ट्राशी जोडला. अमृतपाल म्हणाला, हिंदु राष्ट्र म्हणजे काय?, कुठे स्थापन झाले. लोक त्याची वकिली करतात तेव्हा त्यांना धोका वाटत नाही का? त्यासाठी कधी कधी हिंसक पद्धतीचा अवलंब केला जातो की आम्ही कुणालाही जगू देणार नाही, सगळ्यांना हिंदू बनवू. हिंदु राष्ट्राची कल्पना खलिस्तानच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. हिंदु राष्ट्रामध्ये इतरांची ओळख समाविष्ट नाही, एकतर तुम्ही हिंदू आहात किंवा मृत आहात. ते तुम्हाला पर्याय देत नाहीत. उलट खलिस्तानची कल्पना किती शुद्ध आहे, असेही अमृतपालने म्हटले.

कोण आहे अमृतपाल?

अमृतपाल काही काळापूर्वी दुबईमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. किसान आंदोलन आणि लाल किल्ला हिंसाचाराचा प्रसिद्ध चेहरा दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अमृतपाल पंजाबला परतला. येथे आल्यानंतर त्याने दीप सिद्धू यांच्या ‘वारीस पंजाब दे’ संस्थेची सूत्रे हाती घेतली.

Khalistan supporter Amritpal’s claim I am not an Indian citizen, passport is just a travel document

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात