Chandrababu Naidu आंध्रप्रदेशात चंद्रबाबू नायडू सरकारने विसर्जित केले वक्फ बोर्ड

जगन सरकारच्या काळातील आदेशही रद्द केले 

विशेष प्रतिनिधी

तिरुमला : आंध्र प्रदेश सरकारने वक्फ बोर्डाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. चंद्राबाबू नायडू सरकारने मागील जगन मोहन सरकारने स्थापन केलेले वक्फ बोर्ड बरखास्त केले आहे. आंध्रचे कायदा आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री एन.मोहम्मद फारूक यांनी याबाबतचे आदेश शनिवारी जारी करण्यात आल्याचे यांनी सांगितले. आंध्र प्रदेश सरकार आता नवीन वक्फ बोर्ड स्थापन करणार आहे. मागील प्रशासनाने जारी केलेले GO-47 रद्द करून नवीन सरकारने GO-75 जारी केले.

वक्फ विधेयकावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने शनिवारी (३० नोव्हेंबर) राज्य वक्फ बोर्डाची पूर्वीची स्थापना रद्द करण्याचा आदेश जारी केला, कारण न्यायालयाच्या स्थगितीनंतरही बोर्ड बराच काळ काम करत नव्हते. GO 75 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या आदेशात, राज्य वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठीच्या सर्व पूर्वीच्या सूचना रद्द करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या सदस्य निवडीसंदर्भातील खटल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वास्तविक, 30 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशात मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बंदी आल्यानंतर बराच काळ मंडळाचे कामकाज होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. आदेशात म्हटले आहे की वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी ही समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिली आणि खटला सोडवण्याचा आणि प्रशासकीय पोकळी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Chandrababu Naidu government dissolves Waqf Board in Andhra Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात