देश सोडून पळून गेलेल्या परमबीर यांच्या आरोपांवर केंद्रीय एजन्सीने विश्वास का ठेवावा ? – जयंत पाटील


‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे.Why should the central agency believe the allegations of Parambir who fled the country? – Jayant Patil


विशेष प्रतिनिधी

नाशिक : अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे .



राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे. तिथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे.

लोकांची दिशाभूल करून सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सरकार चांगलं काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे,’ असंही जयंत पाटील म्हणाले.

Why should the central agency believe the allegations of Parambir who fled the country? – Jayant Patil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात