वीज संकट : महाराष्ट्रात फक्त 7 दिवसांचा उरलाय कोळशाचा साठा, देशभरात विजेच्या संकटात वाढ


सध्या महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी केवळ 7 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. तर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. देशाच्या गरजेच्या केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रासह देशभरात विजेचे संकट सातत्याने वाढत आहे. नियमानुसार वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे 26 दिवसांचा कोळशाचा साठा असणे आवश्यक आहे.Power Crisis Only 7 days of coal reserves in Maharashtra, increase in power crisis across the country


वृत्तसंस्था

मुंबई : सध्या महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी केवळ 7 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. तर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. देशाच्या गरजेच्या केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रासह देशभरात विजेचे संकट सातत्याने वाढत आहे. नियमानुसार वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे 26 दिवसांचा कोळशाचा साठा असणे आवश्यक आहे. मात्र, हा साठा सध्या केवळ एक ते सात दिवसांचा शिल्लक आहे. त्यामुळे महानिर्मितीकडून गरजेच्या तुलनेत 2300 ते 2600 मेगावॅट कमी वीज निर्मिती केली जात आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील विजेच्या मागणीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर येथील विजेची मागणी २० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. तर देशात कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळशाच्या तुटवड्याची समस्या आहे. त्यामुळे एकीकडे मागणी वाढली तर दुसरीकडे विजेचे उत्पादन घटले. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंग आणि लाईट फेलचा प्रश्न निर्माण झाला आहे.



कोळशाचा साठा कमी, म्हणून वीज संकटात वाढ

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार, सध्या देशात गरजेच्या तुलनेत केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे. अशा स्थितीत देशातील 173 पैकी 97 वीजनिर्मिती कंपन्यांची स्थिती चिंताजनक आहे. या उपलब्ध कोळशाच्या साठ्यापैकी 81 टक्के कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या देशातील 18 वीज निर्मिती केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. अशा निर्मिती केंद्रांमधून 39 हजार 222 मेगावॅट वीजनिर्मिती होते. कोळसा खाणीपासून दूर असलेल्या 155 वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 28 टक्के कोळसा उपलब्ध आहे. अशाप्रकारे एकूण 173 उत्पादन केंद्रांमध्ये केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात कोळशाच्या टंचाईचा परिणाम

महाराष्ट्रातील वीजनिर्मिती केंद्रांची स्थिती चिंताजनक आहे. कोराडी वीजनिर्मिती केंद्रात केवळ 2.21 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये केवळ 2.80 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक आहे. भुसावळमध्येही केवळ 1.24 दिवसांचा तर परळीत एका दिवसापेक्षा कमी साठा आहे. तसेच पारस येथे 5 दिवस, चंद्रपुरात 7 दिवस आणि खापरखेडा येथे 6 दिवसांचा कोळसा साठा आहे.

महानिर्मितीला दररोज 9330 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 1 लाख 38 हजार मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. मात्र 1 लाख 20 हजारांवरून केवळ 1 लाख ते 29 हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध होत आहे. अशा प्रकारे वीजनिर्मितीत 2300 ते 2600 मेगावॅटचा तुटवडा आहे. 9330 मेगावॅटऐवजी केवळ 6700 ते 7000 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.

महावितरण कंपनीने गुरुवारी खुल्या बाजारातून 600 ते 800 मेगावॅट वीज खरेदी करून सकाळपासून सायंकाळपर्यंत लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात रोखण्यात यश मिळवले. मात्र त्यानंतर दुपारी 1 ते 3च्या दरम्यान 1700 मेगावॅटचे अघोषित लोडशेडिंग करावे लागले. जेथे कोळशाचे साठे उपलब्ध आहेत, तेथे रेल्वेची वाहतूक व्यवस्था कमकुवत आहे.

जिथे वाहतूक व्यवस्था आहे तिथे कोळशाचा साठा नाही.मालवाहू गाड्या नसल्यामुळे कोळसा खाणीतून वीजनिर्मिती केंद्रापर्यंत कोळशाची वाहतूक करणे शक्य होत नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात विजेची निर्मिती होत नसल्याने महाराष्ट्रासह देशभरात विजेचे संकट वाढत आहे.

Power Crisis Only 7 days of coal reserves in Maharashtra, increase in power crisis across the country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात