विशेष प्रतिनिधी
सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बुद्धी चालत नाही, कोणतेही निर्णय सरकारकडून घेतले जात नाहीत, या सरकारमध्ये ताळमेळ नाही.त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर संपूर्ण मेंदूला लकवा मारला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत केली. Paralyzed not only his hands but also his brain; Chandrakant Patil criticizes Thackeray-Pawar government
प्रवीण दरेकरांना सरकारने अपात्र केले आहे. त्यामुळे हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करून काहीही करू शकते. आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाऊ. तेथे सरकार उत्ताणे पडणार असून थप्पड खाण्याची खूप सवय या सरकारला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
आधीच्या सरकारला शरद पवार म्हणत होते की, तुमच्या हाताला लकवा मारला आहे. पण मी म्हणतोय की, आता यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला आहे. यांची बुद्धीच चालत नाही. कोणतेच निर्णय घेत नाहीत.यांनी पाच आयएएस अधिकारी घालवले. या अधिकाऱ्यांना आयुष्यात चांगले काम करता आले असते, असे पाटील म्हणाले.
https://youtu.be/_CQkgQMn7jY
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App