‘भारत चंद्रावर पोहोचलाय आणि आपण जगाकडे मागतोय पैशांसाठी भीक’, नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान सरकारला सुनावले!

सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे.

विशेष प्रतिनिधी

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्याच देशाच्या सरकारवर निशाणा साधत आपला देश जगाकडे पैशाची भीक मागत आहे, तर शेजारी भारत देश चंद्रावर पोहोचला आहे, असे म्हटले आहे. India has reached the moon and we are begging the world for money Nawaz Sharif told the government of Pakistan

किंबहुना, दिल्लीत यशस्वीपणे पार पडलेली G-20 शिखर परिषद आणि ऐतिहासिक चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे नवाझ शरीफ यांचे  दु:ख अधिकच तीव्रतने बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्याच देशाच्या विद्यमान सरकारवर तसेच माजी लष्करप्रमुखांवर निशाणा साधला.  कारण, सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे.

त्यामुळे नवाझ शरीफ यांनी माजी लष्करी जनरल आणि न्यायाधीशांवर ही टिप्पणी केली आहे. लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे ७३ वर्षीय माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी देशाच्या आर्थिक संकटावर आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, पाकिस्तानच्या आर्थिक संकटाला देशाचे माजी जनरल आणि न्यायाधीश जबाबदार आहेत.भारताने जे साध्य  केले ते पाकिस्तानला का जमले नाही? नवाझ शरीफ यांनी लंडनहून लाहोरमध्ये त्यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ या पक्षाला संबोधित करताना या गोष्टी सांगितल्या.

India has reached the moon and we are begging the world for money Nawaz Sharif told the government of Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात