विशेष प्रतिनिधी
नाशिक : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती आणि त्याच दिवशी शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!, या दोन समांतर राजकीय घडामोडी आज घडल्या.
नीट पेपर फुटी विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. नरेंद्र मोदींनी युवकांच्या भावनांना प्राधान्य दिले आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी आज केले.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | On Shiv Sena leader and Maharashtra Minister Sanjay Shirsat visiting them at their residence, father of Cockroach Janta Party President Abhijeet Dipke, Bhagwan Shankar Dipke, says, “To us, he is a relative first and a Minister… https://t.co/3rKs4hKOXq pic.twitter.com/Kuq37zNwe5 — ANI (@ANI) July 26, 2026
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | On Shiv Sena leader and Maharashtra Minister Sanjay Shirsat visiting them at their residence, father of Cockroach Janta Party President Abhijeet Dipke, Bhagwan Shankar Dipke, says, “To us, he is a relative first and a Minister… https://t.co/3rKs4hKOXq pic.twitter.com/Kuq37zNwe5
— ANI (@ANI) July 26, 2026
– संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी
पण आज दुपारी छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांनी कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन त्याच्या पालकांची भेट घेतली. अभिजित दिपके याचे वडील भगवान शंकर दिपके यांनी संजय शिरसाट यांचे स्वागत केले. शिरसाट यांनी निवासस्थानी दिलेल्या भेटीबाबत भगवान दिपके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “आमच्यासाठी संजय शिरसाट हे आधी नातेवाईक आहेत आणि मग ते मंत्री आहेत.
ते आम्हाला फोन का करत नाहीत किंवा घरी का येत नाहीत??, असा मला प्रश्न पडायचा; पण त्यांच्या या भूमिकेचा मला खरोखरच अभिमान वाटतो. त्यांनी स्पष्ट केले की, जर त्यांनी त्या काळात आम्हाला फोन केला असता किंवा भेटायला आले असते, तर इतरांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला असता; म्हणूनच, आम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा असूनही त्यांनी तसे करणे टाळले. इतके जवळचे नाते असूनही आम्हाला भेटता किंवा फोनही करता येत नाही, याचे त्यांना नक्कीच खूप दुःख झाले असणार. आपले मन मोकळे करण्यासाठी ते स्वतःहून आमच्याकडे आले, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोलाची आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App