प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, ज्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) स्थापन केली. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आझाद जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगत आहेत की, हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि सर्व मुस्लिम आधी हिंदू होते. याआधी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या शेहला रशीद यांचे एक वक्तव्य समोर आले होते, ज्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील विकासासाठी मोदी सरकारचे कौतुक केले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील आहे. आझाद 9 ऑगस्ट रोजी भाषण देण्यासाठी येथे पोहोचले होते. व्हिडिओमध्ये आझाद म्हणतात, ‘इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला होता. भारतात कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व या देशाचे आहोत. भारतातील मुस्लिम हे मूळचे हिंदू होते, त्यांनी नंतर धर्मांतर केले.WATCH Hinduism older than Islam, all Muslims were also Hindus; Ghulam Nabi Azad said – 600 years ago all were Kashmiri Pandits
Former Congress leader Ghulam Nabi Azad- Hindu Religion is much older than Islam in India. Muslims in our country are because of Conversion from Hindus and in Kashmir all Muslims were converted from Kashmiri Pandits. Everybody is born in Hindu Dharma only. pic.twitter.com/trWqUyFzrs — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 16, 2023
Former Congress leader Ghulam Nabi Azad-
Hindu Religion is much older than Islam in India. Muslims in our country are because of Conversion from Hindus and in Kashmir all Muslims were converted from Kashmiri Pandits. Everybody is born in Hindu Dharma only. pic.twitter.com/trWqUyFzrs
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 16, 2023
कन्व्हर्ट होऊन मुस्लिम बनले
डोडामध्ये दिलेल्या भाषणात ते म्हणाले की, 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फक्त काश्मिरी पंडित होते. त्यानंतर अनेक लोक धर्मांतर करून मुस्लिम झाले. यावेळी आझाद यांनी लोकांना बंधुभाव, शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले, ‘धर्माला राजकारणात मिसळू नये. लोकांनी धर्माच्या नावावर मतदान करू नये.”
धार्मिक राजकारणावर निशाणा
धर्माला राजकारणाशी जोडणाऱ्यांवरही गुलाम नबी आझाद यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘राजकारणात जो धर्माचा आधार घेतो तो कमजोर असतो. ज्याची स्वतःवर श्रद्धा आहे, तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा आणणार हे योग्य व्यक्ती सांगेल. पण जो दुर्बल आहे तो म्हणेल की मी हिंदू आहे किंवा मुस्लिम. म्हणूनच मला मत द्या.”
बाहेरून आलेलो नाही, इथेच जन्माला आलो
आझाद पुढे म्हणाले, ‘आम्ही बाहेरून आलो नाही. या मातीचे प्रॉडक्ट आहोत. या मातीतच राख व्हायचे आहे. काही बाहेरून आले आहेत, काही आतून आले आहेत, असे भाजपचे काही नेते म्हणाले. मी त्यांना सांगितले की कोणी आतून किंवा बाहेरून आलेला नाही. हिंदूंमध्ये ते जाळले जाते. त्यानंतर हे अवशेष नदीत फेकले जातात. ते पाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाते. ते शेतातही जाते, म्हणजे आपल्या पोटात जाते.
हिंदू-मुस्लिम भेदभाव का करता?
भारतीय मुस्लिमांबद्दल बोलताना डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद म्हणाले की, मुस्लिमही या भूमीत जातात. त्यांचे मांस आणि हाडेदेखील या भारतमातेचा भाग बनतात. मग हिंदू-मुस्लिम कशाला? दोन्ही या मातीत आढळतात. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे- हे सगळे एक राजकीय युद्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App