UP Election : यूपीत काँग्रेसची वाट बिकट, प्रियांका गांधींच्या विश्वासालाच तडा, काँग्रेसचे घोषित उमेदवारच पक्ष सोडू लागले

UP Election Congress in Uttar Pradesh is in dire straits, Priyanka Gandhi announced Congress candidates leaving the party

UP Election : उत्तर प्रदेशात जवळपास तीन दशकांपासून सत्तेचा वनवास भोगत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसमागचे शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसची धुरा आता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या हातात आहे. प्रियांका गांधी यांचा उत्तर प्रदेशात कोणत्याही पक्षाच्या आघाडीशिवाय ४०३ जागा लढवण्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसू लागला आहे. येथे पक्षाने ज्यांना उमेदवारी जाहीर केली, तेच लोक पक्ष सोडून इतर पक्षांत सामील होत आहेत. UP Election Congress in Uttar Pradesh is in dire straits, Priyanka Gandhi announced Congress candidates leaving the party


प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशात जवळपास तीन दशकांपासून सत्तेचा वनवास भोगत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसमागचे शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसची धुरा आता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या हातात आहे. प्रियांका गांधी यांचा उत्तर प्रदेशात कोणत्याही पक्षाच्या आघाडीशिवाय ४०३ जागा लढवण्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसू लागला आहे. येथे पक्षाने ज्यांना उमेदवारी जाहीर केली, तेच लोक पक्ष सोडून इतर पक्षांत सामील होत आहेत.

प्रियांका गांधी राज्याच्या प्रभारी झाल्यानंतर काँग्रेसचे जुने आमदार आणि नेत्यांनी पक्ष सोडण्यास सुरुवात केली आहे. तीन उमेदवारांनी पक्ष सोडल्याने मोठा फरकही पडणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाला नव्या रंगात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या क्रमाने त्यांनी 403 जागांपैकी 40 टक्के महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. तरुणाईवर अधिक विश्वास असलेल्या प्रियांका गांधी यांना याचा मोठा फटका बसला आहे. निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे दिग्गज नेते प्रियांका गांधींचा विश्वास तोडून इतर पक्षांमध्ये सामील होत आहेत.

उत्तर प्रदेशातील निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच अनेक आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य काँग्रेस सोडून भाजप आणि समाजवादी पक्षात दाखल झाले. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांची संख्या वाढू लागली. काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा त्यांच्या घोषित केलेल्या तीन उमेदवारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. आता उत्तर प्रदेश निवडणुकीचा रस्ता प्रियांका गांधींसाठी अधिक कठीण होत चालला आहे.

काँग्रेसला बालेकिल्ल्यातच धक्का बसला

रायबरेली आणि अमेठीनंतर रामपूर हाही काँग्रेसचा मोठा बालेकिल्ला मानला जातो. प्रियांका गांधी यांनी येथील चमरौआ विधानसभा मतदारसंघातून खान युसूफ अली आणि स्वार-तांडा येथून हैदर अली खान उर्फ ​​हमजा मियां यांना पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. यापैकी खान युसूफ अली यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता, त्यांना समाजवादी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. स्वार-तांडा येथील हैदर अली खान ऊर्फ ​​हमजा मियाँ नवाब घराण्यातील आहेत. तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी पक्षही सोडला. हमजा मियाँ अपना दल (एस) मध्ये सामील झाले. त्यांच्या पक्षानेही त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या दोघांशिवाय बरेली कँट मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया आरोन यांनीही पक्ष सोडला आहे. त्यांचे पती प्रवीण सिंग आरोन हे बरेलीमधून काँग्रेसचे खासदार होते आणि सुप्रिया आरोन याही काँग्रेसच्या तिकीटावर बरेलीमधून दोनदा महापौर झाल्या. हे घराणेही जुने काँग्रेस परिवार होते, आता हे लोक समाजवादी पक्षात गेले आहेत. समाजवादी पक्षाने सुप्रिया आरोन यांना बरेली कॅंटमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्ष सोडला

काँग्रेसच्या सातपैकी चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. तिघांनी भाजपमध्ये, तर एकाने राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला आहे. रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह आणि त्याच जिल्ह्यातील हरचंदपूरचे आमदार राकेश सिंह हे बंडखोरी करत होते. याशिवाय सहारनपूरमधील बेहत येथील आमदार नरेश सैनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सहारनपूरचे आमदार मसूद अख्तर इम्रान मसूद यांच्यासोबत आहेत. त्यांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि जाट समाजाचा चेहरा समजले जाणारे माजी खासदार हरेंद्र मलिक आणि त्यांचे पुत्र माजी आमदार पंकज मलिक यांनीही काँग्रेस सोडून सपामध्ये प्रवेश केला. प्रियांका गांधी यांच्या जवळचे ललितेशपती त्रिपाठी यांनाही निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील मिळाला होता, परंतु त्यांनी काँग्रेसला अलविदा केल्यानंतर टीएमसीमध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गजांची सोडचिठ्ठी

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच इम्रान मसूदपासून अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली. काँग्रेस पक्षाकडे सध्या ताकद नाही, असे त्यांना वाटते. पोस्टर गर्ल लखनऊच्या डॉ. प्रियांका मौर्य यांनीही पक्ष सोडून गंभीर आरोप केले आहेत. प्रियांका गांधी ज्यांच्या जोरावर बुंदेलखंडमध्ये पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्या सर्व काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे.

माजी आमदार आणि प्रियांकाच्या सल्लागार समितीचे सदस्य विनोद चतुर्वेदी, माजी आमदार गयादिन अनुरागी, महोबाच्या जुन्या काँग्रेस कुटुंबातील मनोज तिवारी यांनीही सपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसने या तिन्ही नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली होती. त्याचप्रमाणे कानपूर ग्रामीण भागातील काँग्रेसचा मजबूत चेहरा मानल्या जाणाऱ्या माजी खासदार राजाराम पाल हेही पक्ष सोडून सायकलवर स्वार झाले आहेत. काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री आणि बदाऊंचे खासदार सलीम शेरवानी, उन्नावचे माजी खासदार अन्नू टंडन, मिर्झापूरचे माजी खासदार बालकुमार पटेल, सीतापूरचे खासदार कैसर जहाँ, अलिगडचे खासदार विजेंदर सिंह, माजी मंत्री चौधरी लियाकत, माजी आमदार रामसिंग पटेल, माजी आमदार जस्मिन अन्सारी, अंकित परिहार आणि सोनभद्रचे रमेश राही यांनी काँग्रेस सोडली आहे.

UP Election Congress in Uttar Pradesh is in dire straits, Priyanka Gandhi announced Congress candidates leaving the party

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात