ठाकरे सरकारविरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार – अभिमन्यू पवार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आमच्या नियमबाह्य निलंबन प्रकरणाचा सरकारकडून अहवाल मागवून घ्यावा, अशी विनंती केली , असे अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच लोक्षाहीविरोधी वर्तन करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार राज्यपालांकडे केली असल्याचे ते म्हणाले. Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar

तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी १२ आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले, अशी माहिती पवार यांनी दिली.

ते म्हणाले, निलंबित १२ आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना असे सांगितले की, योग्य ती शहानिशा करून आमच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची विनंती केली. लोकशाही विरोधी काम करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार दिली आहे.

पवार म्हणाले, ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवला म्हणून आघाडी सरकारने खोटे कथन करून आम्हाला निलंबित केलं आहे. मिळालेले अधिकार चुकीच्या पद्धतीनं वापरणाऱ्या सरकारने ‘आपल्या सगळ्यांच्या वरती सर्वोच्च असे जनतेचे न्यायालय आहे’ याचा फक्त विसर पडू देऊ नये.

Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात