ठाकरे सरकार नॉटी जमात, इतरांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खोटे ठरवतेय, अमृता फडणवीस यांचा निशाणा


एक माणूस आपल्या जीवाची बाजी लावून एका मुलाचा जीव वाचवत आहे. तर दुसरीकडे नॉटी जमात ही जी लोकं इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं खरं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.Thackeray government targets those trying to save lives of others, targets Amrita Fadnavis


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एक माणूस आपल्या जीवाची बाजी लावून एका मुलाचा जीव वाचवत आहे. तर दुसरीकडे नॉटी जमात ही जी लोकं इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं खरं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

राज्याला रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज असताना भारतीय जनता पक्षाने दमण येथील कंपनीकडून पन्नास हजार इंजेक्शन मागविली होती. मात्र, ठाकरे सरकारने या कंपनीच्या मालकालाच रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले. त्याच्या घराला पोलीसांनी वेढा दिला.



त्यांना सोडविण्यासाठी गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे.

वांगणी रेल्वे स्थानकावर पॉइंटमन मयूर शेळके याने एका अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवला. हा व्हिडीओ शेअर करता अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नॉटी जमात प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाºयांच्या जीवावर उठली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Thackeray government targets those trying to save lives of others, targets Amrita Fadnavis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात