महाराष्ट्रात कोरोनाचे रोज ४०० ते ७०० बळी, आजवर ९७ हजार जण मृत्युमुखी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात रोज ४०० ते ७०० च्या आसपास मृत्यू होत आहेत. गुरुवारी ३०० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली. आजवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ९७ हजारांहून अधिक आहे. यातील २,८३९ हून अधिक मृत्यू हे सहआजारांमुळे झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. Every day 400 death in Maharashtra due to corona

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट जाणवत आहे; तरीही मृतांचा आकडा वाढत असल्याबद्दल राज्य कोरोना मृत्यू विश्लेषण समितीने चिंता व्यक्त केली आहे. यातील निम्म्या मृतांची संख्या १५ फेब्रुवारीनंतर नोंदवली गेली आहे. हे आकडे दुसऱ्या लाटेतील असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.



दरम्यान, देशभरातून झालेल्या मृत्यूंपैकी २० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले. मुंबईतील मृतांचा आकडा १४,९६५ इतका आहे. पुण्यात १२,७३७ मृत्यू नोंदले गेले. ठाण्यात ८,२५५ आणि नागपूरमध्ये ६,७८७ मृत्यूची नोंद झाली.

संपूर्ण देशाच्या तुलनेत आजवर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आजवर जवळपास ५८ लाख जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. गुरुवारी नोंदवलेल्या ३०७ मृत्यूंपैकी २२८ हे गेल्या एका आठवड्यातील होते.

Every day 400 death in Maharashtra due to corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात