Saamana Editorial : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यात काही मंत्र्यांचे खाते बदलण्यात आले, तर अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळातील या मोठ्या फेरबदलावर देशभरात चर्चा सुरू असताना भाजपचा जुना मित्रपक्ष शिवसेनेने यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य म्हणजे लाटेबरोबर वाहून आलेले ओंडके असल्याचे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या संपादकीयात नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱ्यावर लागलेले ओंडकेच आहेत,’ असा टोला भाजपला लगावला आहे. Shiv Sena Saamana Editorial Criticizing Modi Cabinet Expansion
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यात काही मंत्र्यांचे खाते बदलण्यात आले, तर अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळातील या मोठ्या फेरबदलावर देशभरात चर्चा सुरू असताना भाजपचा जुना मित्रपक्ष शिवसेनेने यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य म्हणजे लाटेबरोबर वाहून आलेले ओंडके असल्याचे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या संपादकीयात नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱ्यावर लागलेले ओंडकेच आहेत,’ असा टोला भाजपला लगावला आहे.
भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कंन्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणे अपेक्षित होते. परंतु ते स्थान त्यांना मिळू शकले नाही. यावरून मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना मुखपत्रात यावर भाष्य करताना म्हटले आहे की, ‘श्री. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे’
नारायण राणे यांना टोला लगावताना सामनात म्हटलंय की, ‘महाराष्ट्रातून अखेर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते, पण लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही. राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.’
सामनात म्हटलंय की, ‘कपिल पाटील, डॉ. भारती पवार हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे, असं शिवसेनेने म्हटले आहे.
“पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल वगैरे दोन्ही झाले आहेत. कोसळलेली अर्थव्यवस्था, कोरोना महामारीने निर्माण केलेले आरोग्यविषयक अराजक, शिक्षणातील गोंधळ, महागाई, बेरोजगारीची खडखड यावर ‘उतारा’ म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसून आपल्याच टेबलावर ठेवले आहेत. या मंत्रिमंडळ फेरबदलाचे वैशिष्ट्य काय? तर वाजपेयी काळातील एक राजनाथ सिंह व मुख्तार अब्बास नक्वी हे दोन सोडले तर बाकी सर्व पत्ते नवेच आहेत. एक तर नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱ्यावर लागलेले ओंडकेच आहेत,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
Shiv Sena Saamana Editorial Criticizing Modi Cabinet Expansion
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App