वृत्तसंस्था
माले : मालदीवची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मदत केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताचे आभार मानले आहेत. मालदीवच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना ते म्हणाले की, भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीवचे कर्ज फेडण्यासाठी खूप मदत केली आहे.President Muijju thanked India for helping Maldives to pay off its debt
भारत आणि मालदीव लवकरच मजबूत संबंध निर्माण करतील आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करतील अशी आशा मुइज्जू यांनी व्यक्त केली. मालदीवमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुटवड्याबाबत मुइज्जू म्हणाले की, त्यांचे सरकार भारत आणि चीनसोबत करन्सी स्वॅप करारांबाबत बोलत आहे.
भारताने ‘नेबर फर्स्ट पॉलिसी’ अंतर्गत मालदीवला 400 कोटी रुपयांची मदत दिली आहे. मालदीवने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि कर्जाची परतफेड सुलभ करण्यासाठी भारत मदत करेल अशी आशा व्यक्त केली.
मालदीव आर्थिक संकटाचा सामना करत आहे, असा इशारा आयएमएफने दिला होता
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, काही महिन्यांपूर्वी IMF ने मालदीवला इशारा दिला होता की, जर त्याने आपल्या आर्थिक धोरणात बदल केले नाहीत तर त्याला कर्जाबाबत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याआधी शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुइज्जू म्हणाले होते की, चीनने पाच वर्षांपर्यंत कर्ज परतफेडीतून दिलासा दिला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवमध्ये ‘इंडिया आऊट’ मोहीम राबवणारे मोहम्मद मुइज्जू सत्तेवर आल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला फटका बसत आहे. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
दोन्ही देशांमधील तणाव दूर करण्यासाठी मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल भारत दौऱ्यावर येत आहेत. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ते नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये रोड शो करणार आहेत. या काळात लोकांना मालदीवमध्ये जास्तीत जास्त संख्येने येण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App