विशेष प्रतिनिधी
जिनेव्हा : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने काबूल हल्यावरील निषेधाच्या पत्रकातून तालीबानचा संदर्भ वगळला आहे. अफगाणिस्तानच्या गटांनी इतर कोणत्याही देशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊ नये असे आवाहनही केले आहे.UNSC Skips Taliban Mention in Terror Statement
या महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यावर अध्यक्ष म्हणून भारताने सही केली आहे. विशेष म्हणजे 16 आॅगस्ट रोजी अफगाणिस्तानबाबत काढलेल्या निवेदनात, सुरक्षा परिषदेने वेगळी भूमिका स्वीकारली होती. “तालिबान किंवा इतर कोणत्याही अफगाणिस्तान समूहाने किंवा व्यक्तीने इतर कोणत्याही देशाच्या भूभागावर कार्यरत दहशतवाद्यांना समर्थन देऊ नये, अशी ताकीद दिली होती.
तालिबान नेतृत्वाकडे भारत कशा पध्दतीने पाहतो यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, तालिबानने म्हटले आहे की त्यांना अफगाणिस्तानमधील भारताचे प्रकल्प कधीच समस्या नव्हती.
ते अशरफ घनीच्या कठपुतळी सरकारकडून त्यांना दिल्या जात असलेल्या पाठिंब्याला विरोध करत होते, असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App