बिहार निवडणुकीत केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस अन् राजदचं वाढलं टेन्शन Aam Aadmi Party
विशेष प्रतिनिधी
पाटणा: आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक पक्ष उतरला आहे. तोही विधानसभेच्या सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवण्याच्या इराद्याने आणि या नव्या स्पर्धकाचं नाव आम आदमी पार्टी आहे. होय हे खरं आहे, कारण आता आम आदमी पार्टीने इंडि आघाडीपासून फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिहार विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे, तशी पक्षाकडून घोषणा देखील झाली आहे. एवढच नाहीतर इंडि आघाडी ही केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती, असं आपकडून सांगितल्या गेल्याने आता विरोधकांची इंडि आघाडी तुटल्यातच जमा असल्याचे दिसत आहे.
खरंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीतच याची झलक दिसली होती. जेव्हा काँग्रेस आणि आम आदम पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत भाजप वरचढ ठरला आणि दिल्लीची सत्ता भाजपच्या हाती आली. आता बिहार विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार आहेत. तर दुसरीकडे याचा थेट फायदा राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला होणार असल्याचे दिसत आहे.
आम आदमी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘इंडि’ आघाडीपासून वेगळे होवून विरोधी पक्षांच्या रणनीतीकारांना धक्का दिला आहे. ‘इंडि’ आघाडीतील अनेक पक्षांनी आधीच स्वतःच्या स्वतंत्र मार्गावर चालणे सुरू केले आहे. आता ‘आप’ने असेही म्हटले आहे की ‘इंडि’ आघाडा फक्त लोकसभा निवडणुकीसाठीच स्थापन करण्यात आली होती. बिहारमध्य आम आदमी पार्टी निवडणूक स्बवळावर निवडणूक लढवण्यास सक्षम आहे आणि या विश्वासावरच पक्ष पुढे पुढे जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे मुख्य पात्र आहेत, जे २०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतः निवडणूक प्रचाराची रणनीती बनवत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App