विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी काल फुल्ल बॅटिंग करायला गेले, पण भरपूर खोटं बोलून बसले. त्यांनी अग्निवीर योजनेवरून सरकारवर तोंडसुख घेताना सभागृहात खोटी माहिती दिली. शहीद अग्निवीराच्या वडिलांनी मदतीचा आकडा सांगून पोलखोल केली. Rahul Gandhi’s false speech in Lok Sabha on Ayodhya compensation
राहुल गांधींनी काल अयोध्येबाबतही खोटी विधाने केली. फैजाबाद अयोध्येचे समाजवादी पार्टीचे खासदार अवधेश पासी यांना शेजारी बसवून राहुल गांधी भरपाईबाबत लोकसभेत खोटं बोलले. अयोध्येतील व्यावसायिकांना सरकारने भरपाई दिली नसल्याने तिथे भाजप हरला, असा दावा राहुल गांधींनी केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आकड्यांच्या पुराव्यानिशी राहुल गांधींचे सगळे आरोप खोडून काढले. अयोध्येत विविध विकास कार्यांसाठी विस्थापित कराव्या लागलेल्या लोकांना तब्बल 1,733 कोटी रुपयांची भरपाई दिल्याची माहिती त्यांनी दिली.
राहुल गांधींच्या पक्षाने अयोध्येतील रामाला वनवास दिला. पण सुप्रीम कोर्टाने अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्यासाठी परवानगी देताच भव्य मंदिर उभे राहिले. अयोध्येत अभूतपूर्व विकासकामे झाली. अयोध्येतील विस्थापितांना सरकारने 1733 कोटी रुपयांची भरपाई दिली.
अयोध्येत भरपाईचे आकडे असे :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App