विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या अनेक भागात थंडीची लाट आली आहे. शुक्रवारी मोठा गारठा वाढला होता. पण, २४ तासात तिचा प्रभाव ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.cold in Maharashtra due to north winds; Chance of rain in some places in the state
पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले की, उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात येत आहेत. परंतु येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारतात अँटीसायक्लोनची उपस्थिती असल्याने, महाराष्ट्रावरील वारे ईशान्येकडे, त्यानंतर पूर्वेकडून ईशान्येकडे आणि नंतर पूर्वेकडे वळतील.
“२९ जानेवारीपासून, येत्या तीन ते चार दिवसांत रात्रीचे तापमान हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढेल,” डॉ कश्यप म्हणाले. सध्या, विदर्भात विशेषत: यवतमाळ, नागपूर, बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थंडीचा दिवस राहण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज असून या आठवड्यात म्हणजेच २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान, राज्यात दिवसा आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा खूपच कमी असेल.
cold in Maharashtra due to north winds; Chance of rain in some places in the state
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App