WATCH : शाळेची घंटा वाजणार आता १७ ऑगस्टपासून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तब्बल दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा हालचालींना वेग आला आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. The school bell will ring Now from 17 August

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. अनेक निर्बंध सरकारने शिथील केले आहेत. त्यामुळे जेथे जेथे अनुकूल परिस्थिती आहे तेथे शाळा सुरु करण्याचा आग्रह धरला जात असल्याने शिक्षण मंत्रालय आणि शिक्षक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

याबाबतची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. अर्थात महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर हा निर्णय घेऊन शाळा सुरु होण्याचा मार्ग काढतील, असे गायकवाड म्हणाल्या.

  •  शाळेची घंटा वाजणार १७ ऑगस्टपासून
  • दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर निर्णय घेतला
  •  अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरली
  •  अनेक निर्बंध सरकारने शिथील केले आहेत
  •  शिक्षण मंत्रालय, शिक्षण विभागाचा निर्णय
  •  महापालिका, नगरपलिका, ग्रामपंचायतस्तरावर परिस्थितीनुसार अंतिम निर्णय

The school bell will ring Now from 17 August

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात