मोदी सरकारची 8 वर्षे : सरकारची भलामण; विरोधकांचे शरसंधान… पण जनतेच्या मनात नेमके काय??


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सरकारची 8 वर्षे पूर्ण होताना मोदी समर्थकांनी अर्थातच भलामण केली आहे, तर विरोधकांनी शरसंधान साधले आहे. या दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत. पण मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण होताना जनतेला काय वाटते??, जनतेच्या मनात नेमके काय आहे?? जनता मोदी सरकारचे मूल्यमापन कसे करते??, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
8 years of Modi government: Government’s recommendation; Opposition

लोकल सर्कल्स गेल्या 8 वर्षांपासून वार्षिक सर्वेक्षण करून केंद्र सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करते. हे सर्वेक्षण सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी म्हणजेच 6 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध केले होते. मोदी सरकार 1.0 आपल्या 5 वर्षात लोकांच्या अपेक्षांवर जास्त खरा उतरला आहे. 2019 मध्ये PM मोदींच्या नेतृत्वाखाली NDA ने 353 जागा जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या.

30 मे 2022 रोजी मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या अभ्यासात, भारतातील 350 जिल्ह्यांतील 64,000 हून अधिक नागरिकांकडून सुमारे 221,000 प्रतिसाद मिळाला. या सर्वेक्षणात ६५ % पुरुष आणि ३५ % महिलांचा समावेश होता.



 सर्वेक्षणाचे निष्कर्ष

  •  33 % नागरिकांना सरकारने त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले आहे, असे वाटले.
  •  34% लोकांच्या सरकारने अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
  •  कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर, मोदी सरकारचे रेटिंग गेल्या तीनमध्ये 51 % वरून 67 % वर गेले आहे.
  •  37 % लोकांना सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर काम करत आहे, असे वाटते.
  •  2020 मध्ये, 37 % लोकांचा विश्वास होता की स्वयंरोजगार मिळणे सोपे झाले आहे. 2021 मध्ये हा आकडा 44 % आणि 2022 मध्ये 60 % झाला आहे.

 जगात भारताची विश्वासार्हता वाढली

  •  2020 मध्ये 79 % लोकांचा विश्वास होता की जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सुधारली आहे.
  •  2021 मध्ये 59 % लोकांनी हा विश्वास व्यक्त केला होता. 2022 मध्ये पुन्हा हा आकडा 79 % आला आहे.

 2022 च्या सर्वेक्षणात भ्रष्टाचार कमी
करण्यात फारशी सुधारणा नाही. 2020 मध्ये, 49% नागरिकांनी भ्रष्टाचार कमी झाल्याचे सांगितले, परंतु 2021 च्या सर्वेक्षणात ही टक्केवारी 39% पर्यंत खाली आली. गेल्या 3 वर्षात भ्रष्टाचार कमी झाल्याचे 46% नागरिकांनी गृहीत धरून यावर्षी रेटिंग थोडे वाढले आहे.

 महागाई वाढली की कमी झाली?

2002 मध्ये, 36 % लोकांचा असा विश्वास होता की सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. 2021 मध्ये त्यात घट झाली आणि ती 19 % राहिली. 2022 मध्ये केवळ 17 % लोकांचा असा विश्वास आहे की सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित करत आहे.

 जातीयवादावर नियंत्रण किती?

यासाठी 11 हजार 394 जणांची उत्तरे मिळाली. सरकारने जातीयवादाचा मुद्दा चांगल्या पद्धतीने हाताळला असे सुमारे 60 % लोकांचे मत आहे. यामध्ये सरकार अपयशी ठरल्याचे 33 % लोकांचे मत आहे. 7 % लोकांनी उत्तर दिले की सांगता येत नाही.

 दहशतवाद नियंत्रणात की बेलगाम?

– मोदी सरकार 2.0 च्या तीन वर्षात दहशतवाद कमी झाला आहे की नाही असे विचारले असता, 81 % लोकांनी होय असे उत्तर दिले. 14 % लोकांनी नाही असे उत्तर दिले आणि 5 % लोकांनी सांगू शकत नाही, असे सांगितले. या प्रश्नावर 11321 उत्तरे मिळाली.

8 years of Modi government: Government’s recommendation; Opposition

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात