नितीश कुमारांचे अनेक आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात; सुशील मोदींचा ‘जेडीयू’मध्ये फूट पडल्याचा दावा!


… तेव्हापासून जनता दलात बंडखोरीची परिस्थिती आहे, असंही सांगितलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी केला आहे. भाजपा नेत्याच्या या दाव्यामुळे जेडीयूमध्ये फूट पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. Many of Nitish Kumars MLAs specialists in contact with BJP  Sushil Modis claim of split in JDU

यासोबत सुशील मोदी म्हणाले की, आता जेडीयूमध्ये पळापळ होईल, पण नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नितीश कुमार यांनी काहीही केले तरी त्यांना एनडीएमध्ये परत येणार नाही. बिहारमध्ये बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या 17 वर्षांत एकाही आमदार किंवा खासदाराला भेटण्यासाठी एक मिनिटाचाही वेळ दिलेला नाही. खासदारांना वाट पहावी लागायची, आता ते प्रत्येक आमदाराला अर्धा तास वेळ देत आहेत.

याशिवाय सुशील मोदींनी सांगितले की, नितीश कुमार यांनी राहुल गांधींना आपला नेता म्हणून स्वीकारले आहे आणि तेजस्वी यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे, तेव्हापासून जनता दलात बंडखोरीची परिस्थिती आहे. जेडीयूचा कोणताही आमदार किंवा खासदार राहुल गांधी किंवा तेजस्वी यादव यांना स्वीकारण्याच्या बाजूने नाही. किंबहुना, अनेक खासदारांना आपले तिकीट कापले जाणार आहे, गेल्या वेळी 17 जागा मिळाल्या होत्या, या वेळी ते इतक्या जागा जिंकता येतील का? असे वाटत आहे. यावेळी 5 ते 10 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या स्थितीत नाही. नितीश कुमारांनंतर आपले भविष्य काय असेल, आपले काय होईल, हेच कळत नाही, अशी भावना खासदारांची आहे. प्रत्येकाला आपले भविष्य अंधारात दिसत आहे.

Many of Nitish Kumars MLAs specialists in contact with BJP  Sushil Modis claim of split in JDU

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात