वृत्तसंस्था
जबलपूर : Jabalpur मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवरील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज उलटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १९ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. १५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.Jabalpur
बरगी शहराचे पोलिस अधीक्षक (CSP) अंजुल मिश्रा यांनी सांगितले की, एमपी टुरिझमच्या क्रूझमध्ये ४० ते ४५ जण होते. अचानक आलेल्या वादळामुळे हा अपघात झाला.Jabalpur
अपघाताची माहिती मिळताच, एसडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अंधारामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. मात्र, मोठ्या टॉर्चच्या साहाय्याने लोकांचा शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App