विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन


प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एका शेतकऱ्याने विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या शेतकऱ्याचा सोमवारी जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.The death of the farmer who set himself on fire in front of the legislature was due to a dispute over land grabbing

सुभाष देशमुख (५६) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. देशमुख हे ४५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते.



सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी होत. त्यांनी २३ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले होते. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या हातून पेट्रोलची बाटली काढून घेतली होती. दरम्यान, त्यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जेजे रुग्णालयात हलवण्यात आले होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

The death of the farmer who set himself on fire in front of the legislature was due to a dispute over land grabbing

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!