जुलैमधील धुवांधार पावसामुळे मुंबईच्या तलावात ८० टक्के पाणीसाठा


विशेष प्रतिनिधी

मुंबई – जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत पावसाने महामुंबई परिसरात ओढ दिली होती; मात्र त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सुमारे ८० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मुंबईला आता दोन लाख ९० हजार दक्षलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत हा पाणीसाठा जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Enough water in Mumbai lakes



ऑगस्टच्या मध्यानंतर आणि सप्टेंबरमध्ये कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा धरणात आवश्ययक पाणीसाठा जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या तलावात ११ लाख ५७ हजार १६१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी दोन लाख ९० हजार १६१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.

Enough water in Mumbai lakes

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात