रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद ठेवणे बंधनकारक असल्याचेही सांगितले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवर भोंगे वाजवण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद ठेवणे बंधनकारक आहे. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली.
तसेच, प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांसंदर्भात परवानगी आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस निरीक्षकांवर असेल. तक्रारी आल्यानंतर कारवाई न झाल्यास त्या निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल.
राज्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम, 2000 लागू असून, दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशी माहितीही फडणवीसांनी दिली.
याशिवाय तक्रारींच्या आधारे पोलिस कारवाई करतील आणि संबंधित अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला जाईल. त्यानंतर, नियमानुसार मंडळाकडून संबंधित न्यायालयात खटला दाखल केला जाईल असे मुख्यमंत्री यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App