Socialist + secular : इंदिरा गांधींनी राज्यघटनेत घुसविलेल्या शब्दांवर संघाने आक्षेप घेताच काँग्रेसने काढला फणा!!

Dattatreya Hosable

इंदिरा गांधींनी राज्यघटनेत घुसविलेल्या शब्दांवर संघाने आक्षेप घेताच काँग्रेसने काढला फणा!! Dattatreya Hosable

त्याचे झाले असे :

इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सत्ताधारी संघ आणि भाजप परिवाराने आणीबाणी विरोधामुळे मोठे कार्यक्रम घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते संघाच्या स्वयंसेवकांपर्यंत सर्वांनी त्यात भाग घेतला. इंदिरा गांधींनी स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी देशावर आणीबाणी कशी लादली, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार कसे हिरावले होते, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि लाखो कार्यकर्त्यांना तुरुंगात कसे डांबले होते, त्यांच्यावर कसे अत्याचार केले होते, याची सविस्तर वर्णने संघ आणि भाजपच्या नेत्यांनी केली. काँग्रेसने त्यांना प्रत्युत्तर देताना इंदिरा गांधींनी 1980 मध्ये कसे कम बॅक केले, याची वर्णने केली. पंतप्रधान मोदींनी देशात अघोषित आणीबाणी लादल्याचा आरोप केला.

पण त्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर देशाचे लक्ष वेधले. राहुल गांधी जे राज्यघटनेचे लाल पुस्तक घेऊन सगळीकडे हिंडतात, त्या राज्यघटनेच्या सरनाम्यात इंदिरा गांधींनी “समाजवादी” socialist आणि “धर्मनिरपेक्ष” secular हे दोन शब्द घुसविले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते शब्द राज्यघटनेच्या सरनाम्यात लिहिले नव्हते. त्या शब्दांची आता खरी गरज उरली आहे का??, असा सवाल दत्तात्रय होसबळे यांनी उपस्थित केला. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली. काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी संघाविरुद्ध फणा काढला.



– आणीबाणीत 42 वी घटनादुरुस्ती

1975 मध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर इंदिरा गांधींनी स्वतःच्या प्रतिमावर्धनासाठी राज्य घटनेच्या सरनाम्यात बदल केला त्यांनी 42 वी घटना दुरुस्ती आणून राज्यघटनेच्या सरनाम्यात “धर्मनिरपेक्ष” आणि “समाजवादी” हे दोन शब्द समाविष्ट केले. या घटना दुरुस्ती मध्ये कम्युनिस्टांनी इंदिरा गांधींना साथ दिली होती. “धर्मनिरपेक्ष” आणि “समाजवादी” या दोन शब्दांमुळे आपली प्रतिमा उजळून निघेल. जनता आपल्याला अधिक मान्यता द्यायला लागेल, असा इंदिरा गांधींचा होरा होता. परंतु प्रत्यक्षात दोनच वर्षांमध्ये त्यांचा भ्रमनिरास झाला. 1977 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पण त्यानंतर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने राज्यघटनेत बदल केला नाही. त्यामुळे “धर्मनिरपेक्ष” आणि “समाजवादी” दोन्ही शब्द सरनाम्यात तसेच राहिले. जे मूळच्या राज्यघटनेमध्ये कधीही नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेच्या सरनाम्यात “धर्मनिरपेक्ष” आणि “समाजवादी” या दोन शब्दांचा समावेश केला नव्हता. तो इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या कालावधीत केला.

– काँग्रेस + कम्युनिस्टांची टीका

नेमकी याचीच आठवण दत्तात्रय होसबळे यांनी जाहीरपणे सांगितली. “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्ष” दोन शब्द आता काळाच्या कसोटीवर योग्य राहिलेत का??, ते शब्द राज्यघटनेत ठेवावेत का??, असा विचार करावा लागेल, असे दत्तात्रय होसबळे म्हणाले. त्याबरोबर काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे नेते भडकले. इंदिरा गांधींनी घुसविलेल्या अजेंड्याला संघाने धक्का लावलेला बघताच काँग्रेस नेत्यांनी खवळून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संघाने राज्यघटनेचा कायमच द्वेष केला. त्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे त्यामुळे त्यांना “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्षता” आहे दोन शब्द नको आहेत. राज्यघटनेच्या विरोधात बोलायचे आणि कृती करायची ही त्यांची जुनी सवय आहे. त्यात नवीन काही नाही. पण देशातली जनता हे घडू देणार नाही, असे शरसंधान जयराम रमेश यांनी साधले. केरळ मधले कम्युनिस्ट नेते होनन मुल्ला यांनी रमेश यांना दुजोरा दिला.

पण या निमित्ताने दत्तात्रय होसबळे यांनी काँग्रेस + राज्यघटना + इंदिरा गांधींनी घुसविलेले शब्द हे विषय ऐरणीवर आणले. काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठे शस्त्र उपलब्ध करून दिले.

Review terms secular socialist in constitution preamble RSS Gen Secy Dattatreya Hosable

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात