अहमदाबाद दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानात ६५० फूट उंचीवर झाला होता बिघाड!

Ahmedabad accident

जाणून घ्या, MCA सचिवांनी विमान अपघाताबद्दल काय माहिती दिली?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघाताने केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. अपघाताला ४८ तास उलटले आहेत, परंतु त्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. १२ जून रोजी दुपारी नेमके काय घडले? अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर कसे कोसळले? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. दरम्यान, नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.

समीर कुमार सिन्हा यांनी सांगितले की, १२ जून रोजी दुपारी २ वाजता आम्हाला अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळाली. अधिक माहितीसाठी आम्ही तातडीने अहमदाबाद एटीसीशी संपर्क साधला. एआय १७१ मध्ये एकूण २४२ लोक होते हे आम्हाला कळले. २३० प्रवासी, २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते.

या विमानाने दुपारी १:३९ वाजता धावपट्टीवरून उड्डाण केले. ६५० फूटापर्यंत उंच गेल्यानंतर, विमानात काही समस्या निर्माण झाली आणि विमान आणखी उंच जावू शकले नाही. त्याच वेळी, विमानाच्या पायलटने अहमदाबाद एटीसीला कळवले की मेडे (पूर्ण आपत्कालीन परिस्थिती) आहे.

समीर कुमार सिन्हा पुढे म्हणाले, “एटीसीच्या मते, जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अगदी १ मिनिटानंतर, विमान विमानतळापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर भागात कोसळले.

The Air India plane in the Ahmedabad accident had a malfunction at an altitude of 650 feet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात