Operation sindoor मधून भारताने पाकिस्तान मध्ये खोलवर केलेले हल्ले आणि इजरायलने इराणवर केलेले हल्ले याचे आंतरराष्ट्रीय राजकारणातले मायने काही प्रमाणात वेगळे असले, तरी एका बाबतीत विलक्षण साम्य आहे, ते म्हणजे पाकिस्तान आणि इराण यांच्या रूपाने दोन इस्लामी कट्टरतावादी देशांना इस्लामेतर देशांनी ठोकले. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष ठोकले जात असताना इराण किंवा पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बाजूने कुठलाही इस्लामी देश उभा राहू शकला नाही.
भारतासारख्या दहशतवाद पीडित देशाने पाकिस्तान सारख्या दहशतवाद पुरस्कार करणाऱ्या देशाला ठोकणे हा खरं म्हणजे नैसर्गिक न्यायाचा उत्तम नमुना ठरला. जो भारताने खूप पूर्वीपासूनच अंमलात आणायला हवा होता, पण मवाळ परराष्ट्र धोरणामुळे भारत तो अंमलात आणत नव्हता. परंतु भारताने मवाळ धोरण टाकून दिले आणि जहाल धोरण स्वीकारले. त्यानंतरच पाकिस्तान सारख्या दहशतवाद पुरस्कार करणाऱ्या देशाला भारताला ठोकता आले.
अर्थात भारताने पाकिस्तानला ठोकले, त्यावेळी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने लुडबुड करण्याचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या न झालेल्या शस्त्रसंधीचे 13 वेळा श्रेय घेतले. कारण operation Sindoor मधून भारताने केलेले हल्ल्यात पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लागला होता. जी अण्वस्त्रे पाकिस्तानच्या मालकीची नसून ती अमेरिकेच्या मालकीची असल्याचे बोलले गेले. त्या चर्चेत बरेच तथ्य असल्याचे अमेरिकेच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हालचालीतून समोर आले. म्हणूनच ट्रम्प प्रशासनाने मध्ये लुडबुड करून शस्त्रसंधीसाठी दोन्ही देशांवर दबाव आणला होता. तो काही प्रमाणात work झाला.
– ट्रम्पने हात झटकले
पण इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये आपला कुठलाही हात नसल्याचे सांगून ट्रम्प प्रशासनाने हात झटकले. इराणने अजूनही अणुकरार केला नाही, तर आणखी प्रखर हल्ले होतील, अशी दमबाजी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी इजराइलला इराणवर हल्ला करायला लावले. त्याच्या आधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीसाठी लुडबुड केली. आंतरराष्ट्रीय राजकारणातले हे मायने खरे मानले, तरी पाकिस्तान आणि इराण या दोन देशांच्या रूपाने कट्टरतावादी इस्लामी देशांना इस्लामी नसलेल्या देशांनी ठोकले ही वस्तुस्थिती लपून राहात नाही.
पाकिस्तानची हिंमत नाही
भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध जेवढे कडवट आणि शत्रुतेचे आहेत, तेवढे भारत आणि इराण यांच्यातले संबंध शत्रुतेचे नाहीत किंबहुना काही प्रमाणात मैत्रीचे आहेत, पण काश्मीर सारख्या प्रश्नावर इराणने नेहमीच पाकिस्तानची बाजू उचलून धरली. त्यामुळे भारताचे त्या देशाशी गंभीर मतभेद देखील आहेत. त्याचबरोबर इराण आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे कट्टर इस्लामी विचारधारेला पोसणारी आहेत. त्यामुळे अर्थातच इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध अतिशय मधुर आहेत. पण असे असताना देखील भारताने पाकिस्तानला ज्यावेळी ठोकले, त्यावेळी इराण पाकिस्तानच्या मदतीला धावून आला नव्हता आणि आता इजरायलने इराणला ठोकले, त्यावेळी देखील पाकिस्तानची देखील इराणच्या बाजूने उघडपणे उभे राहण्याची हिंमत झाली नाही. उलट इजरायल इराणला ठोकत असताना पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या हा army day च्या परेड निमित्ताने अमेरिकेत पोहोचला, पण त्याने इजराइल आणि अमेरिकेच्या निषेध करण्याची हिंमत दाखवली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App