विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने स्वतःच घेतलेल्या सरकारच्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास झाले. पण काही विभागांची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्या विभागांना नापासचे गुण मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मधले सर्व विभागांना 100 दिवसांची कामगिरी दिली होती. त्यासाठी त्यांनी तब्बल 902 निकष ठरवले होते. या 902 निकषांच्या आधारे सर्व विभागांची तपासणी करून त्यांना गुण देण्यात आले. त्यामध्ये 12 विभागांनी 100 % गुण मिळविले. यामध्ये गृह, जलसंपदा, ग्रामविकास, बंदरे, पशूसंवर्धन आदी खात्यांचा समावेश राहिला.
उरलेल्या 36 विभागांनी 90% पासून 24% पर्यंत कामगिरी केली. नगर विकास – 2, अन्न नागरी पुरवठा संरक्षण आणि सामान्य प्रशासन सेवा या विभागांची कामगिरी 35 % पेक्षा कमी राहिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App