वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 40 व्या फेरीनंतर 5G Spectrum चा लिलाव अखेर सोमवारी संपुष्टात आला आहे. 5G स्पेक्ट्रममधून आता केंद्र सरकारला तब्बल 1.50 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांनी या लिलावात बाजी मारली असून आता संपूर्ण देशात एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्या 5जी चे जाळे पसरवणार आहेत. Auction complete, Reliance Jio, Airtel companies bid
या कंपन्या पसरवणार जाळे
गेल्या 7 दिवसांपासून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होता. या लिलावातून सरकारला 1.50 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्या देशभरात 5 जी चे जाळे पसरवणार असून वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांकडून मोजक्या क्षेत्रातच लिलावाला पसंती देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत या 5G विस्तारासाठीच्या अलॉटमेंट करण्यात येणार आहेत.
कधीपर्यंत सुरू होणार सेवा?
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता या लिलावानंतर 5G साठी जोमाने कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
2014 : 60,677
2015 : 1,09,227
2016 : 65,789
2021 : 77,821
2022 : 1,50,000 कोटी + & counting.
(सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App