दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सर्वत्र चर्चा आहे. याप्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे.Delhi Violence Take action so that violence will not happen again, Home Minister Amit Shah gave instructions to the police
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सर्वत्र चर्चा आहे. याप्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत की, दंगलखोरांवर अशी कठोर कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नयेत.
पोलीस आयुक्तांना फोनवरून सूचना दिल्या
दिल्लीत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचारानंतर लगेचच अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.
दिल्ली हिंसाचारावरून राजकारण
दिल्लीतील हिंसाचारावरून राजकारणही सुरू झाले आहे. या घटनेबाबत केंद्रातील विद्यमान सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत. त्याचवेळी भाजपकडूनही उत्तर दिले जात आहे. कारण दिल्लीतील पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, त्यामुळे केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मात्र, याला उत्तर देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वतीने देशाला एक पत्र जारी करण्यात आले असून त्यात काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींचा उल्लेख करण्यात आला आहे.
यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानमधील करौली येथील हिंसाचारावर भाजप नेते गौरव भाटिया यांनी काँग्रेसकडे उत्तर मागितले आहे. काँग्रेस पक्ष विसरतो की, जर बहुतेक दंगली कुणाच्या राजवटीत घडल्या असतील तर त्या काँग्रेस पक्षाच्या राजवटीत घडल्या आहेत.
अटकसत्र सुरू
हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलीस आता सातत्याने अटक करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून लोकांची ओळख पटवली जात असून, या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना तातडीने अटक केली जात आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आधीच अटक केली होती, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस सर्व आरोपींची कोठडी घेत आहेत. त्यानंतर आरोपींकडून हिंसाचाराबद्दल चौकशी केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App