राज ठाकरेंना मोदी सरकार पुरविणार विशेष सुरक्षा, पीएफआयकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर त्यांना मागील काही दिवसांपासून धमकावलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. राज यांना पीएफआय या संघटनेकडून धमकावले जात आहे.Modi government to provide special security to Raj Thackeray, decision against threat from PFI

राज ठाकरे हे एक मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ते ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर राज यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे.



१२ तारखेच्या ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. ईदपर्यंत म्हणजेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाही तर आम्ही मशिदींसमोर भोंग्यावर तितक्याच आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू असा इशारा राज यांनी दिला आहे. भोंग्याचा विषय हा सामाजिक असून आपण भोंग्यांविरोधातील भूमिकेवरुन मागे हटणार नाही, असे म्हटले आहे.

Modi government to provide special security to Raj Thackeray, decision against threat from PFI

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात