प्रतिनिधी
मुंबई : शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. परंतु, मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप त्यांनी आमदारकीचा त्याग केला नसल्याची माहिती समोर आली आहे. याचे कारणही शिंदे गट किंवा भाजप नसून मित्रपक्षांवरचा बेभरवसा असल्याचे सांगितले जात आहे. Uddhav Thackeray’s MLA resignation still in pocket
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर आपले सिंहासन डळमळीत झाल्याचा अंदाज आल्याने, उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी मुख्यमंत्री पद आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी राज्यपालांच्या हातात राजीनामा सोपवलाही. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे यापुढे ते विधिमंडळात पुन्हा पाऊल ठेवणार नाहीत, असे तर्क त्यावेळेस लढवले गेले.
परंतु, महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने विधानभवनात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या हजेरी पुस्तकात सही केल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. विधिमंडळ सदस्य म्हणजे आमदार असलेली व्यक्तीच या पुस्तकात सही करू शकते. त्यामुळे राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, आमदारकीचा नव्हे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
कारणे काय?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App