Prakash Ambedkar : 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल शब्द नाही; पोलिसांच्या अत्याचारावर मौन, नुकसानभरपाईचे काय? प्रधानांच्या राजीनाम्यावर आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar

वृत्तसंस्था

मुंबई : ‘Prakash Ambedkar  नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी या निर्णयाची घोषणा करत राजीनाम्यामागील भूमिका मांडली. दरम्यान, या राजीनाम्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत, “प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल ओतण्याचे काम केले असून, कधीही न झुकणाऱ्यांना आता जनतेसमोर नाक रगडावे लागले आहे,” असा घणाघाती टोला लगावला आहे.Prakash Ambedkar

‘नीट’ पेपरफुटीमुळे देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे उपोषण आणि दिवसेंदिवस वाढणारा राजकीय दबाव पाहता धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडणे पसंत केले. आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना त्यांनी आंदोलनात ‘अँटी सोशल एलिमेंट्स’ (समाजकंटक) घुसल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.Prakash Ambedkar



२२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर मौन, नुकसानभरपाईचे काय?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या राजीनामा पत्रातून सरकारची मानसिकता स्पष्ट होते. आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा दावा करणारे प्रधान, या परीक्षा घोटाळ्यानंतर ज्या २२ निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत किंवा कुठलीही खंत व्यक्त केली नाही. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीचाराचा किंवा अत्याचाराचा उल्लेखही त्यांनी टाळला आहे. तसेच, बाधित विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना काय नुकसानभरपाई मिळणार, याविषयी कुठलीही स्पष्टता सरकारकडून आलेली नाही.”

सरकारवर सर्वोच्च न्यायालयाचाही राग

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही भाष्य केले. “सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा सरकार वर राग आहे असं दिसतंय. आधी झुरळ हा शब्द म्हणून आणि नंतर लाठी चार्जचे व्हिडिओ केलेले आम्हाला बघायला वेळ नाही हे दोन वाक्य त्यांचे होते. नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणा याबद्दल सरकार बोलायला तयार नाही त्यामुळे माघार का घ्यावी? विद्यार्थ्यी जे निर्णय घेतील त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल,” असा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकरांनी केला.

धर्मेंद्र प्रधान यांची सोशल मीडिया पोस्ट

प्रधान यांनी आपला राजीनामा व्यक्त करणारे एक पत्र प्रसिद्ध केले. दोन पानांच्या, ५७५ शब्दांच्या या पत्रात, प्रधान यांनी इतर गोष्टींबरोबरच, दोन ठिकाणी तरुणांची दिशाभूल केल्याचा उल्लेखही केला आहे. पत्राचा हा भाग खाली ठळकपणे दिला आहे.
प्रधान यांनी आपला राजीनामा व्यक्त करणारे एक पत्र प्रसिद्ध केले. दोन पानांच्या, ५७५ शब्दांच्या या पत्रात, प्रधान यांनी इतर गोष्टींबरोबरच, दोन ठिकाणी तरुणांची दिशाभूल केल्याचा उल्लेखही केला आहे. पत्राचा हा भाग खाली ठळकपणे दिला आहे.

Prakash Ambedkar Slams Dharmendra Pradhan’s Resignation Over Student Suicides

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात