विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLC Elections महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शन केले, तर काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि जागावाटपावरील वादही समोर आले.MLC Elections
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी महायुतीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून भाजप ११, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ जागांवर उमेदवार उभे करत आहे.MLC Elections
दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील जागावाटपही अंतिम झाले आहे. काँग्रेस सर्वाधिक ८ जागांवर, ठाकरे गट ४ आणि शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढवत आहे.MLC Elections
विदर्भात सर्वाधिक चुरस
नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर या भागांमध्ये महायुती व मविआमध्ये थेट लढती होत आहेत. नागपूरमध्ये भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात सामना रंगणार आहे. अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवाराच्या प्रवेशामुळे समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
महायुतीत जागावाटपावरून तणाव
नाशिक, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि काही अन्य मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच झाली. काही वाद थेट केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्यापर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. अखेर नाशिकची जागा शिवसेनेकडे, तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपकडे गेला.
काही उमेदवार चर्चेत
भाजपने वर्धा-गडचिरोली मतदारसंघातून उद्योगपती आणि खासदार Supriya Sule यांचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीची राज्यभर चर्चा होत आहे.
तसेच, शरद पवार गटाकडून पुणे मतदारसंघासाठी श्रीकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
निवडणुकीचे राजकीय महत्त्व
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर ही पहिली मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आधारित निवडणूक असल्याने सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी मतदारसंघांतील राजकीय ताकद मोजण्याची ही संधी मानली जात आहे. विशेषतः विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App